AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वासघात कुणी केला?, नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारावं, राधाकृष्ण विखेपाटील यांची टीका

भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही.

विश्वासघात कुणी केला?, नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारावं, राधाकृष्ण विखेपाटील यांची टीका
राधाकृष्ण विखे पाटील
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 13, 2023 | 6:14 PM
Share

सोलापूर : मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोले यांनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा, असं ते म्हणाले. सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केला अशी टीका नाना पटोले यांनी केली. या पटोले यांच्या वक्तव्याचा विखेपाटील यांनी समाचार घेतला. विश्वासघात कोणी केला, हा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी आधी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना विचारावा. विश्वासघात कोणी केला, हे बाळासाहेब थोरतांना विचारलं पाहिजे. विश्वासघात झाला की नाही. हे सर्व त्यांच्या सहमतीने झाले हे मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उभे राहण्याच्या या निर्णयाला समर्थन आहे का? यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की, विश्वासघात केला की नाही, असं विखेपाटील यांनी स्पष्ट केलं.

आमचा विरोध असण्याचे कारण नाही

राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय स्वतः घेतला की पक्ष नेतृत्वाला विचारले हे मला माहिती नाही. भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करते. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही.

राधाकृष्ण विखेपाटील यांनी सांगितलं की, काँग्रेसमध्ये कोणते गट आहेत हे माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये नसल्याने तेथे काय सुरू आहे मला कल्पना नाही. या सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झालेली आहे.

म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा

काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्यजित तांबे यांची अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं, असंही विखेपाटील यांनी म्हंटलं.

सत्यजित तांबे भाजपामध्ये आल्याने भाजपाची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे नाही. कारण भाजप आधीच तिथे ताकतवान आहे. मात्र सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होईल. चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो.

चंद्रकांत खैरे यांनी बेताल वक्तव्य बंद करावे

विखेपाटील म्हणाले, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची किव करावीसी वाटते. चंद्रकांत खैरे यांनी असे बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. पंकजा मुंडे या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि करत राहणार, असंही विखेपाटील यांनी स्पष्ट केलं.

लोकांसाठी काम करता येत नसेल, तर सन्मानानं एक्झीट केलेली बरी, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी त्यांना ठाकरे गटात येण्याची ऑफरच दिली.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार