AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या

Rahul Gandhi and Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधी यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या
राहुल गांधी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 23, 2024 | 4:07 PM
Share

Rahul Gandhi and Somnath Suryawanshi: बीड अन् परभणी घटनेतील पीडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अन् काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी आणि बीड दौरा केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या पोलिसांनीच केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांना मारण्यात आले. ते संविधानचे संरक्षण करत होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी २० ते २५ मिनिटे चर्चा केली. त्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन मी अहवाल पाहिला आहे. त्यांचे व्हिडिओ पहिले आहे. फोटोग्रॉफ पाहिले आहे. ते पहिल्यावर ९९ टक्के नाही तर शंभर टक्के सांगतो त्यांचा मृत्यू पोलीस कठोडीत झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे वक्तव्य केले ते खोटो बोलले आहे.

सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

घटनेस मुख्यमंत्री जबाबदार

राहुल गांधी यांनी विचारले की या घटनेवर राजकारण होत नाही का? त्यावर राहुल गांधी संतप्त झाले. काहीही राजकारण नाही. या घटनेत ज्या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारले आहे, त्यांना शिक्षा मिळावी. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते ही या घटनेस जबाबदार आहे. पोलिसांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री खोटे बोलले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राहुल गांधी राजकीय हेतूने आले आहे. केवळ द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आल्यावर कठोर कारवाई करण्यार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल