AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे.

आंध्र-तेलंगणात अडकलेल्या 26 हजार मजुरांना परत आणणार : विजय वडेट्टीवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 01, 2020 | 3:33 PM
Share

चंद्रपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Workers from Maharashtra are stuck in Telangana) आहे. लॉकडाऊन घोषित केल्यामुळे राज्यातील अनेक नागरिक इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून व्यवस्था केली जात आहे. चंद्रपूर-गडचिरोतील एकूण 26 हजार मिरची तोड मजूर तेलंगणा-आंध्र प्रदेशात अडकले आहेत. या मिरची तोड मजुरांना परत आणण्यासाठी राज्याची टास्क फोर्स याबाबत इतर राज्यांशी चर्चा करत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी (Workers from Maharashtra are stuck in Telangana) दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले,” इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी राज्य सरकार 450 बसेस पाठवणार आहेत. मजूर गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासोबत कुणी नियम मोडल्यास त्याला दोन हजार रुपये दंडाची शिक्षाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने परती नंतरच्या परिस्थितीसाठी पाच सूत्री कार्यक्रम आखला आहे.”

चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील हजारो मजूर मिरची तोड कामाच्या निमित्ताने परराज्यात अडकले आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यात चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील 26 हजार मजूर परतीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व मजुरांची अवस्था तिथल्या शेत शिवारात दयनीय झाली आहे. गेले दीड महिना हे सर्व मजूर महाराष्ट्र सरकारकडे परतीची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. राज्य शासनाने आंध्र आणि तेलंगणा राज्याशी चर्चा करत यातून मार्ग काढला आहे.

राज्यात या मजुरांना परत आणण्यासाठी एका टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. सुमारे 26 हजार मजुरांना चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आणले जाणार आहे. यासाठी 450 बसेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

यासोबतच एवढ्या मोठ्या संख्येतील मजूर परतल्यावर त्यांना गावाने कोरोना संबंधी खबरदारी घेण्यासाठी पाच सूत्री नियमावली आखली जाणार आहे. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे शेत शिवारात-चिखलात-उन्हात तापत असलेल्या आणि अन्न-पाणी यांची सोय नसलेल्या मजुरांना दिलासा मिळणार आहे.

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून पहिली ट्रेन रवाना

स्थलांतरित मजुरांसाठी तेलंगणाहून आज (1 मे) पहिली ट्रेन झारखंडसाठी रवाना झाली आहे. एकूण 1200 मजूर या ट्रेनमधून प्रवास करत आहेत. आज पहाटे 4 वाजता ही ट्रेन तेलंगणावरुन निघाली, अशी माहिती रेल्वे पोलीस महासंचालक यांनी दिली.

राज्याबाहेर अडकलेल्या सर्वांना परत आणणार

“इतर राज्यात अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत आणले जाणार आहे. परप्रांतीय मजूर त्यांना त्यांच्या राज्यात परत पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

संबंधित बातम्या :

चंद्रपूरमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना GPS ट्रॅकिंग लावण्याचा विचार : विजय वडेट्टीवार

Maharashtra LockDown | 3 मेनंतर प्रत्येक झोनप्रमाणे मोकळीक देऊ, पण झुंबड नको : मुख्यमंत्री

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा