AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..

आज जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आला आहे, यावर आता सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजितदादा, जयंत पाटील भेट; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या मी स्वत:..
Supriya SuleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 22, 2025 | 9:08 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिकवेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु आज जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

बंद दाराआड चर्चा 

जयंत पाटील हे जेव्हा अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात आले तेव्हा तिथे गर्दी होती. मात्र जयंत पाटील यांनी कक्षात प्रवेश करताच सर्वांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

महाराष्ट्रात सशक्त लोकशाही आहे, त्यामुळे लोक एकमेकांना भेटत असतात. मी स्वत: अश्विनी वैष्णव यांना अर्धा तास भेटून आले आहे. बारामतीच्या विकासासंदर्भात ही बैठक होती. शिवराज सिंह चौहान, अमित शाह यांना देखील आम्ही भेटत असतो. लोकशाहीमध्ये भेटी गाठी झाल्या पाहिजे, संवाद झाला पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जेव्हापासून हे सरकार आलं आहे,  तेव्हापासून 100 दिवसांत या सरकारचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, या शंभर दिवसांमध्ये एका मंत्र्याची व्हिकेटही गेली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मी गेल्या महिन्यापासून हेच सांगत आहे, की महाराष्ट्रात निधीची कमतरता आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या,

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.