अदिती तटकरे यांनी महिला का अपाञ ठरवल्या आहेत त्याचं उत्तर द्यावे, सुषमा अंधारेंच्या संताप..
लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोठ्या प्रमाणात अपात्र ठरवले. यावरून सुषमा अंधारे यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच काही गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केले.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, लाडकी बहिण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. 80 लाख महिला कपात केल्या आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी महिला का अपाञ ठरवल्या आहेत त्याचं उत्तर द्यावं. 288 कोटी हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतुन गेले आहेत. श्रेय वादात अदिती तटकरे पुढे असतात. चिकित्सा आधी का केली नाही. निवडणूक नावाचा वाद होता का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गरज सरो वैद्य मरो अशी झाली. पगारी मतदार बंद केले. 288 कोटी गुलाल बुक्का सारखी उधळले आता उत्तर द्यावं लागेल. योजना लागू करताना ऐवढी घाई का केली आणि सरसकट पैसे का दिले? आदिती तटकरे यांना खाते सांभाळता येत नाही.
पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटले की, अशोक खरातचे हातपाय चेपुन द्यायाला भक्तांची गर्दी लागली आहे. दारुमुळे 22 लोक मृत्युमुखी पडले त्या घरच्या महिलांचे काय त्यांच्या झालेल्या अकल्याणाचे काय?. हातभट्टी काढण्याचे नाटक केले…परत तिथं हातभट्टी सुरू होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? खरंच हे कायमचे बंद होईल का? मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या महिलांचं काय मंत्री आदित्य तटकरे उत्तर देतील का?
गृह खात्याकडून आम्ही काही अपेक्षा ठेवत नाहीत. स्वतः नितेश राणे गृहमंत्र्यांना घरचा आहेर देताय. गृह खात्यावरती सर्व नियंत्रण सेल झाल आहे, असा गंभीर आरोपही यादरम्यान सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली. लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र मोठ्या संख्येने ठरवण्यात आले, त्यावरूनच त्यांनी निशाणा साधला.
सुषमा अंधारे यांच्या या टीकेवर आदिती तटकरे उत्तर देण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे नक्की काय उत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. सुषमा अंधारे यांनी थेट आदिती तटकरे यांच्यावर नाव घेऊन टीका केली. महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. सुरूवातीला अर्ज करणाऱ्या सर्वांनाच पैसे देण्यात आली. मात्र, आता कारवाई केली जात आहे.
