AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर मुलाचा तो मेसेज पाहिला अन् तानाजी सावंत प्रचंड घाबरले, ऋषीराज यांच्या बेपत्ता प्रकरणात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

मोबाईलवर मुलाचा तो मेसेज पाहिला अन् तानाजी सावंत प्रचंड घाबरले, ऋषीराज यांच्या बेपत्ता प्रकरणात मोठं ट्विस्ट
| Updated on: Feb 10, 2025 | 8:15 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.  दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

साधारणपणे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराज यांनी एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले  त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हे विशाखापट्टणमला आहेत, ते आता पुण्याकडे निघाले आहेत. तानाजी सावंत हे स्वत: पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले असून, ते सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया 

दरम्यान या सर्व प्रकरणावर तानाजी सावंत यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. तो अचानक एअरपोर्टला गेला, यामुळे मी कॅाशियस झालो. तो बाहेर जाताना नेहमी सांगुन जातो. पहील्यांदाच असे झाले त्यानं काहीच सांगितले नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं? 

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज हे अचानक एअरपोर्टला गेले. ते घरातून कुठेही बाहेर जाताना घरी सांगून जातात. मात्र त्यांनी यावेळी घरी काहीच सांगितले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ते बेपत्ता असल्याची बातमी समोर आली, पोलिसांनी शोधही सुरू केला. मात्र आता ऋषीराज हे बेपत्ता नसून ते विशाखापट्टणमला होते, ते आता पुण्याकडे निघाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काही वेळ या बातमीनं चांगलाच गोंधळ उडाला.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.