AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

sanjay raut : संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकारला भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात, असं म्हणत राऊतांनी टीका केली.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
| Updated on: Jul 19, 2026 | 10:35 AM
Share

दिल्लीतील सोनम वांगचुक यांचे उपोषण दिल्ली पोलिसांनी मोडून काढलं. वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. आता दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने उद्या आयोजित केलेल्या आंदोलनातही विरोधी पक्षाचे नेते सामील होण्याची शक्यता आहे. एकीकडे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचाही आरोप सत्ताधारी भाजप नेते करत आहेत. त्यांतर होणाऱ्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या कालच्या कारवाईचा संदर्भ देऊन देशात हुकूमशाही सुरू झाल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘महात्मा गांधींनीही ब्रिटिशांच्या काळात उपोषण केलं. २१ -२१ दिवस उपोषण करून ब्रिटिशांना चर्चेला आणलं. पण स्वातंत्र्यानंतर सोनम वांगचुक जेव्हा विद्यार्थ्यांसाठी उपोषण करतात तेव्हा सरकार चर्चा करत नाही. २० व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात इतक्या मोठ्या माणसाला फरफटत नेलं. ज्याची उभं राहण्याची उपोषणाने ताकद नाही, त्यांच्यासाठी स्ट्रेचर आणलं नाही. त्यांच्यावर उपोषणाचा दबाव आणला’.

‘वांगचुक देशासाठी प्राणत्याग करण्यास तयार आहे. सरकार घाबरलं आहे. सरकारने मागण्यावर चर्चा करावी. धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाही. ते मंत्री आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थी उद्ध्वस्त झाले आहे. सरकारची जबाबदारी आहे. पण पोलीस बळाचा वापर करून सरकार त्यांना अटक करत आहे. दीपकेंवर लाठीहल्ला करून त्यांना जखमी करत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर शाईफेक करायला प्रवृत्त करत आहे. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. उद्या संसदेचं अधिवेशन आहे. त्यात हा विषय येईल. उद्या दिल्लीत मोर्चा आहे, असेही ते म्हणाले.

‘याला राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीय भीती वाटली म्हणून तुम्ही वांगचुक यांना घेऊन गेला. ही राजकीय भीती आहे. तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्ही ब्रिटिशांचे खबरी होता. त्यामुळे ब्रिटीशांची भीती वाटली नाही. तुम्हाला नेहरू, दिपके, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि वांगचुकची भीती वाटते. उद्याच्या मोर्चात आम्ही सर्व सहभागी होणार आहोत. संसदेचे सर्व सदस्य मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली.

Follow Us
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?