AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकांच्या मार्गातील बेड्या तर तुटल्या, पण… सामनातून ठाकरेंनी व्यक्त केला संशय

सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारल्यानंतर सामना अग्रलेखातून महायुती सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. मतचोरी, ईव्हीएम घोटाळा आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावर ठाकरे गटाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

निवडणुकांच्या मार्गातील बेड्या तर तुटल्या, पण... सामनातून ठाकरेंनी व्यक्त केला संशय
uddhav thackeray devendra fadnavis
| Updated on: Jan 05, 2026 | 8:13 AM
Share

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्या महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक लगावली आहे. या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानांचा पाढा वाचण्यात आला आहे. न्यायालयाने निवडणुकांच्या मार्गातील सरकारी बेड्या तोडल्या असल्या तरी, सत्ताधारी मंडळी विधानसभेप्रमाणेच येथेही मतचोरी करतील, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे.

प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली लुटीचा परवाना?

राज्यातील मुंबईसह २७ महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांवर गेल्या साडेतीन वर्षांपासून जनतेचे प्रतिनिधी नाहीत. केवळ पराभवाच्या भीतीपोटी सरकारने या निवडणुका लांबवल्या. या काळात प्रशासकांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे. या अग्रलेखात म्हटले आहे की, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलेच झाले, परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? विधानसभेप्रमाणे या निवडणुकांतही मतांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

निवडणुका जाहीर होताच ईव्हीएम यंत्रणांच्या वापराबाबत ठाकरे गटाने संशय व्यक्त केला आहे. व्हीएमच्या कमतरतेचे कारण पुढे करीत मध्य प्रदेशातून २५ हजार ईव्हीएम येथे आणण्यामागे सत्ताधाऱ्यांचे काही कारस्थान आहे का? तसेच, व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर न करण्याचा निर्णयही मतचोरीसाठीच घेतला आहे का? असाही सवाल ठाकरे गटाने केला आहे.

मोदी राजवटीत केंद्रीय यंत्रणांचे घोडे न्यायालयाच्या थपडा खाल्ल्याशिवाय पुढे सरकतच नाही. प्रभाग रचना, ईव्हीएमची कमतरता आणि परीक्षांमुळे शाळा उपलब्ध नसल्याची कारणे सांगून सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही पुंगी तोडून मोडून टाकली आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका उरकण्याची तंबी दिली आहे. या निवडणुका लांबविण्यासाठी प्रभाग रचनेची सबब चालणार नाही. हे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. तीन वर्षे निवडणुका लांबविणारे तुम्ही ‘डेडलाइन’च्या गोष्टी कुठल्या तोंडाने करीत आहात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे खरा, पण त्या मार्गावरही सत्ताधारी मंडळी ‘मतचोरीचे काटे’ पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील ही भीती आहेत, अशी शंकाही यातून उपस्थित करण्यात आली आहे.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार