AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवले

उद्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आज वर्गात सर्व मुले बसली होती. याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलाला एका रुममध्ये एकटेच बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरलेली नाही. तुला इथेच बसावे लागेल, असे सांगितले. जवळपास तीन तास मुलगा वर्गात एकटाच बसला होता.

Dombivali : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार, शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवले
शाळेची फी थकवल्याने एका विद्यार्थ्याला वेगळ्या वर्गात तीन तास एकटेच बसवलेImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 8:39 PM
Share

कल्याण : शाळेची फी थकीत असल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्या (Student)ला शाळेने शिक्षा (Punishment) देत या विद्यार्थ्याला एकटेच तीन तास एका रुममध्ये बसविले. जोपर्यंत तुझे आई वडील येणार नाही, तोपर्यंत इथेच बसावे लागेल असे फर्मान सुनावले. या मुलाची मानसिक परिस्थिती ढासळली आहे. त्याला भोवळ आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या शाळेच्या विरोधात शिक्षण प्रशासनाकडून काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. डोंबिवली आजदेपाडा येथे राहणारे मनोज धुरी यांचा 16 वर्षीय मुलगा हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर त्याच्या शाळेत दहावीच्या वर्गाचे क्लास सुरु आहेत. (As the school fees were not paid one student was kept alone in a separate classroom for three hours)

उद्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आज वर्गात सर्व मुले बसली होती. याच दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलाला एका रुममध्ये एकटेच बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरलेली नाही. तुला इथेच बसावे लागेल, असे सांगितले. जवळपास तीन तास मुलगा वर्गात एकटाच बसला होता. आपल्या मित्रांसमोर त्याची इज्जत गेली. ही शिक्षा दिल्यानंतर चंदनची तब्येत बिघडली. त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. प्राथमिक उचपार करीत त्याच्या पालकांना बोलावून घेतले.

शाळेकडून आरोपांचे खंडन

पालकांचा आरोप आहे की, लॉकडॉऊनमुळे आमची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. नोकरी गेली. आम्ही फी भरु शकत नाही. मात्र पैसे हाती येताच फी भरु असे सांगितले. पण मुलाला दिलेली शिक्षा अत्यंत वाईट आहे. यापूर्वीही त्याला शाळेने वर्गाच्या बाहेर उभे केले होते. शाळा प्रशासनाने पालकांच्या आरोपांचे खंडन करीत दोन वर्षापासून फी थकीत आहे. फी भरण्याचा तगादा विद्यार्थ्याकडे लावला नाही. त्यांच्या पालकाना फी भरण्यास सांगितले. त्याच्या पालकांना बोलावून घेतले होते. तोपर्यंत एका वर्गात त्याला बसवून ठेवले. कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही मानसिक त्रास दिलेला नाही. (As the school fees were not paid one student was kept alone in a separate classroom for three hours)

इतर बातम्या

Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती

Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.