AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मीरा भाईंदर पालिकेत आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. (bjp shivsena shivaji maharaj mira bhayandar)

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मीरा भाईंदर पालिकेत आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मीरा भाईंदर महानगरपालिका
| Updated on: Feb 24, 2021 | 7:27 PM
Share

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने फेटाळून लावल्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले. पुतळा उभारण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात अल्यामुळे हा शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यासारखं आहे, असा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. तर शिवसेना राजकारण करत असल्याचं म्हणत भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले. (bjp shivsena criticize each other on shivaji maharaj statue in mira bhayandar)

मीरा भाईंदर शहरातील घोडबंदर येथे छत्रपती शिवाजी माहाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेने आज महापालिकेत मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, शिवसेनेला विरोध करीत सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. हा शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचं प्रताप नाईक यांनी म्हटलं. तर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळून लावत शिवसेना राजकारण करत असल्याचं म्हटलं.

शिवसेनेकडून राजकारण करण्याचं काम

यावेळी बोलताना, “शिवाजी महाराजांच्या पुतळा मीरा भाईंदरमध्ये असावा अशी मागणी भाजपने केली होती. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. पुतळा उभारणीचे काम सुरुही आहे. मात्र, शिवसेना फक्त राजकरण करत आहे. कोणत्याही पक्षाने याचा विरोध केला नाही. शिवसेनेतर्फे चुकीची बातमी शहरात पसरवली जात आहे,” असे ज्योत्स्ना हसनाळे म्हणाल्या.

लवकरच जोडे मारो आंदोलन

दरम्यान, भाजपने पुतळा उभारणीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपने महाराष्ट्राची जाहीर माफी मागवी अशी मागणी केली आहे. तसेच, आम्ही हा विषय राज्य सरकारकडून मंजूर करून आणू, असेही सरनाईक म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजपच्या स्थायी समिती सदस्यांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! राज्यातली पहिली प्रवेशबंदी, परभणीमध्ये 11 जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

Navi Mumbai Municipal Election 2021 : नवी मुंबईत मतदारांची हेराफेरी, एका मतदाराचा भाव पाचशे रुपये!

corona vaccination : तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.