AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या, तीन तासात आरोपींना बेड्या

एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतंच समोर आली आहे. (Dombivali Young Boy Killed By Car)

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या, तीन तासात आरोपींना बेड्या
| Updated on: Dec 08, 2020 | 10:39 AM
Share

डोंबिवली : किरकोळ वादातून एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतंच समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आजदे गावातील पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. (Dombivali Young Boy Killed By Car)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसीमध्ये एक खाजगी कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते. यात पेंडसेनगर परिसरात राहणारा शशांक महाजन त्याच्या एका मित्रासोबत पार्टी करायला बसला होता. या दरम्यान एका तरुणाशी काही कारणात्सव वाद झाला.

हा वाद निवळल्यानंतर शंशाक घरी जाण्यासाठी निघाला. त्याने घरी जाण्यासाठी ओला अॅपवरुन गाडी बूक केली. मात्र ही गाडी वेळेवर न आल्याने तो आणि त्याचा मित्र पायी घरी जाण्यासाठी निघाले.

या दरम्यान ज्या तरुणांसोबत शशांकचा वाद झाला ते सर्वजण लाल रंगाच्या गाडीत बसून त्याचा पाठलाग करु लागले. त्याचवेळी शशांकला वाटले ती त्याने बूक केलेली कार येत आहे. त्यानंतर शंशाकने ती गाडी थांबवल्यानंतर ते तरुण कारमध्ये बसले होते.

या तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर शशांकला रस्त्यावर पाडले आणि त्यानंतर चारचाकी गाडी त्याच्या डोक्यावर घातली. त्यानंतर ते सहाही जणांनी त्याच गाडीतून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस अधिकारी संतोष डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. काही सोय नसताना पोलिसांनी जखमी शशांकला पोलिसांनी आपल्या गाडीत टाकले. त्यानंतर त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र गाडी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला.

दरम्यान याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी एका ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीत लाल रंगाची गाडी जाताना दिसत आहे. या गाडीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डांबरे आणि त्यांच्या पथकाला आरोपीचा सुगावा लागला. त्यानंतर या पोलिसांच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली आहे.  (Dombivali Young Boy Killed By Car)

संबंधित बातम्या : 

परदेशी तरुणीचा कराडमध्ये धिंगाणा, जीप चोरुन पळवली, दहा जण थोडक्यात वाचले

अंमली पदार्थांची तस्करी करणारे नायजेरियन पोलिसांच्या रडारवर, अवैध दारुविक्री करणाऱ्या सहा जणांना अटक

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?