AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात H3 N2 चा पहिला रुग्ण ‘या’ जिल्ह्यात दगावला; आरोग्य विभागाची काळजी वाढली

देशातील महत्वाच्या शहरांमधूनही ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य खाते आता सतर्क झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण संख्या वाढत आहे.

राज्यात H3 N2 चा पहिला रुग्ण 'या' जिल्ह्यात दगावला; आरोग्य विभागाची काळजी वाढली
| Updated on: Mar 24, 2023 | 12:02 AM
Share

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आरोग्य विभागा पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर गेला आहे. कारण काही दिवसांपासून ठाणे जिल्हयात कोरोनाबरोबरच आता नव्याने आलेल्या ‘एच 3 एन 2’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर, कोरोना आणि ‘एच 3 एन 2’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका 79 वर्षीय वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. नव्याने आलेल्या या विषाणूने ठाण्यात पहिला बळी घेतला असल्याने जिल्हा प्रशासनासह, पालिका आरोग्य विभागाची दाणादाण उडाली आहे.

राज्यात आठवडाभरात कोरोनामुळे मृत्यूंच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ‘एच 3 एन 2’ चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, कोविडमुळे ठाणे ग्रामीण क्षेत्रात एक मृत्यु झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

ठाणे जिल्ह्यात कमी झालेल्या कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत आहे. तर जिल्ह्यात कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 289 इतकी असून त्यापैकी 187 रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत.यातील केवळ 11 रुग्ण रुग्णालयात दाखल असुन उर्वरीत सर्व होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

देशातील महत्वाच्या शहरांमधूनही ही रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य खाते आता सतर्क झाले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचेही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आता दिल्लीनंतर मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘एच 3 एन 2’ चा पहिला मृत्यू झाल्याने आता डॉक्टरांनीही सर्वांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  देशातील महत्वाच्या शहरांमधूनही संख्या प्रचंड वाढत असल्याचे दिसून येत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.