AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime: कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार

रस्त्यावर दुचाकी उभी करून फोनवर बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर चौघांनी मिळून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान सोन्याची चेन आणि काही रोख रक्कमसुद्धा गहाळ झाली आहे.

Kalyan Crime: कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार
कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 10:02 PM
Share

कल्याण : अंबरनाथमध्ये लष्करी जवानाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये चौघांच्या टोळक्याने पोलिसांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून इतर फरार दोघा आरोपींचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांतील जवानांना मारहाण होण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दुचाकी बाजूला उभी करण्यावरून वाद

रस्त्यावर दुचाकी उभी करून फोनवर बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर चौघांनी मिळून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान सोन्याची चेन आणि काही रोख रक्कमसुद्धा गहाळ झाली आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर दोघा आरोपींचा शोध सुरू आहे .

मारहाण झालेला जवान मुंबई पोलीस दलातील

चौघांच्या टोळक्याने मारहाण केलेले पोलिस शिपाई विश्राम महाजन हे मुंबईतील दादासाहेब भडकम मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास गावदेवी रोडवरून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये घराचा हप्ता भरण्यासाठी दुचाकीवरून जात होते. नेतीवली सर्कलजवळ आले असता त्यांना फोन आला. त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी त्यांनी गाडी बाजूला लावली. ते फोनवर बोलत होते. इतक्यात तेथे दुचाकीवरुन आणि रिक्षातून आलेल्या चौघांनी महाजन यांना गाडी पुढे घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि चौघांनी मिळून महाजन यांना बेदम मारहाण केली.

झटापटीदरम्यान दागिने आणि रोकड गहाळ

झटापटीदरम्यान महाजन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील 15 हजारांची रोख रक्कम गहाळ झाली. या घटनेनंतर पोलिस शिपाई विश्राम महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर चौकडीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चंदन गौड आणि संदीप तुपेरे अशी अटक आरोपींची नावे असून अन्य दोघे हल्लेखोर फरार आहेत. त्यांचाही कसोशीने शोध घेतला जात आहे. (In a dispute over parking a two-wheeler in Kalyan, the four beatened the police)

इतर बातम्या

Boy Suicide: सनदी अधिकाऱ्याच्या मुलाची सहाव्या माजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, घरी कुणी नसताना मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Rajasthan Crime : घरमालकाला ‘हनीट्रॅप’मध्ये फसवले; तीन महिलांसह चौघांना अटक

Mahim Crime: माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.