AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, पोलिसांनी परत केला 23 लाख 18 हजारांचा मुद्देमाल

या मुद्देमालात तब्बल पाव किलो वजनाची सोन्याची लगड, 59 मोबाईल आणि 16 गाड्यांचा समावेश आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 18 हजार रुपये असून त्यात उल्हासनगर पोलीस ठाण्याने पकडलेल्या 10 लाख 3 हजार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील 9 लाख 35 हजार, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील 3 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, पोलिसांनी परत केला 23 लाख 18 हजारांचा मुद्देमाल
उल्हासनगरात चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 10:07 PM
Share

उल्हासनगर : एखादी गोष्ट चोरीला गेली, की सहसा ती परत मिळण्याची अपेक्षा आपण सोडून देतो. मात्र उल्हासनगरात पोलिसां (Ulhasnagar Police)नी असा चोरीला गेलेला तब्बल 23 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल शोधून तो त्यांच्या मूळ मालकां (Main Owner)ना परत केलाय. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्ष दोन वर्षात झालेल्या चोरीच्या अनेक प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला. यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी समारंभपूर्वक मूळ मालकांना परत केला. या मुद्देमालात तब्बल पाव किलो वजनाची सोन्याची लगड, 59 मोबाईल आणि 16 गाड्यांचा समावेश आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 18 हजार रुपये असून त्यात उल्हासनगर पोलीस ठाण्याने पकडलेल्या 10 लाख 3 हजार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील 9 लाख 35 हजार, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील 3 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या हस्ते हा सगळा मुद्देमाल परत करण्यात आला. (In Ulhasnagar, the stolen goods were returned to the original owners, the police returned 23 lakh 18 thousand rupees)

दरम्यान, ज्या नागरिकांना हा मुद्देमाल परत मिळाला, त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. हा मुद्देमाल आपल्याला परत मिळेल, अशी अपेक्षा सोडून दिलेली असताना पोलिसांनी आमच्या वस्तू शोधून परत केल्यानं सुखद धक्का बसल्याचं हे मूळ मालक म्हणाले. उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात वाहनचोरी, मोबाईल चोरी या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपींना जरब बसवली जावी, अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होतेय.

वाहन विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

भाड्याने घेतलेली वाहने परस्पर विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून 24 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत 2 कोटी 64 लाख रुपये आहे. उमेश चव्हाण आणि अद्बुल कादिर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी ज्या गाड्यांचा हफ्ता थकला आहे त्या गाड्यांच्या मालकांशी संपर्क साधून हफ्ता आपण भरतो सांगून भाड्याने चालवण्यास घ्यायचे आणि परस्पर विकायचे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही आरोपींचा गोरख धंदा सुरु होता. या टोळीत आणखी आरोपींचा सहभाग आहे का त्याची पोलीस चौकशी करत आहेत. (In Ulhasnagar, the stolen goods were returned to the original owners, the police returned 23 lakh 18 thousand rupees)

इतर बातम्या

VIDEO : परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

Thane Crime : क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.