AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे देऊन माणसं परत येणार का?; उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांचा सवाल

सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप आता मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

पैसे देऊन माणसं परत येणार का?; उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांचा सवाल
पुष्पा गायकर, भीमा साळवी
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 10:12 PM
Share

ठाणे : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रखरखत्या उन्हात बसलेल्या 12 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पैसे देऊन आमची माणसे परत येणार आहेत का? असा टाहो कळव्यातील दोन मृतक आईंच्या मुलींनी सरकारकडे फोडला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या आईचा जीव गेला असल्याचा आरोप आता मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित करताना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते.

उन्हात तब्बल सहा तास बसवले

शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. परंतु कार्यक्रमात भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवले. परिणामी 12 श्री सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. कळवा परिसरात राहणाऱ्या भीमा साळवी तसेच पुष्पा गायकर या देखील या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताच्या बळी ठरल्या आहेत.

घरी न परतणाऱ्या आईची शोधाशोध

रात्री उशिरापर्यंत या दोघीही घरी परतल्या नाहीत. म्हणून ज्योत्सना हांडे आणि सारिका पाटील या दोन्ही मुलींनी आपल्या-आपल्या आईंची शोधाशोध करायला सुरुवात केली. सुरुवातीला कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांना त्रास झाला त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र त्या ठिकाणीही या दोघीना त्यांच्या आई सापडल्या नाहीत .

नियोजनशून्य कारभारावर संताप

पोलीस स्टेशन , हॉस्पिटल अशी अनेक ठिकाणे शोधल्यानंतर अखेर एका रुग्णालयात शोध लागला. मात्र रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले होते. आई या जगात नसल्याचे समजताच दोन्ही मुलींच्या पायाखालची जमीन सरकली. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करत जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेता तर नियोजन व्हायला हवे होते.

आमचा माणुस गमावला. यातून तुम्ही समाजकारण केले की राजकारण केले आम्हाला माहीत नाही. मात्र माणसांचा जीव जाईल असे नियोजनशून्य कार्यक्रम यापुढे घेऊ नका. असा संताप मृत भीमा साळवी यांची मुलगी ज्योत्सना हांडे यांनी केला आहे. तर, सरकारला एवढंच सांगेन की सरकारच्या हलगर्जीपणामुळे आमच्या माणसांचा जीव गेला.

तर आईला खरी श्रद्धांजली मिळेल

ही वेळ जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा बघा काय होतंय. असा प्रश्न उपस्थित करत आमची कुटुंबप्रमुख आमची आईच होती. त्यामुळे पैशांची मदत करण्यापेक्षा आमच्या भावांना सरकारी नोकरी लावली तर आमच्या आईला खरी श्रद्धांजली मिळेल. अशी भावना मृत पुष्पा गायकर यांची मुलगी सारिका पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.