AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप-शिंदे गटातील वादानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया; भरसभेतून भाजप आणि…

शिंदे साहेबांनी तुम्हाला जीव लावला. कोणतीही आपत्ती आली तर एकनाथ शिंदेच मागे उभे राहायचे. मग ते तुम्हाला खुपायला का लागले?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला.

भाजप-शिंदे गटातील वादानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया; भरसभेतून भाजप आणि...
shrikant shindeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 2:24 PM
Share

कल्याण : भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून या दोन्ही पक्षात वाद सुरू झाले आहेत. भाजपकडून कुरघोडी होत असल्याने शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिली. त्यानंतर कल्याण, डोंबिवली आणि उल्हानगरात दोन्ही गटाकडून पोस्टरवार सुरू झालं. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटही चवताळला आणि त्यांनीही बोंडे यांची औकात काढली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये शिंदे गटाचा मेळावा होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपली युती नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चागल होतंय, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावले. तसेच उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांनी पोस्टर लावल्याचंही त्यांनी सांगितलं.

आमचं चुकलं कुठं?

या मेळाव्यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. अगोदरच सरकार घरी होतं. आता हे सरकार आपल्या दारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे, अशी टीकाही त्यंनी केली. तसेच राम मंदिर बांधणाऱ्यांसोबत गेलो तर बिघडलं कुठे?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. काँग्रेससोबत जाण्याआधी मी माझं दुकान बंद करेल, असं बाळासाहेबांनीच सांगितलं होतं ना? मात्र, हे सत्तेसाठी पायऊतार झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

ते मान्य आहे काय?

कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून सावरकरांचे धडे वगळले आहेत. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आता जे लोक काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी सांगावं त्यांना हे मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

तरीही टॉप फाईव्हमध्ये कसे?

त्यांच्या डोक्यात खोके प्रचंड घुसले आहेत. आधी खोके यायचे आता ते बंद झाले आहेत, अशी टीका करतानाच कोरोना काळात सामान्य शिवसैनिक रस्त्यावर राबला. घराबाहेर पडला. यांनी फक्त ऑनलाईन मार्गदर्शन केलं. तरीही ते टॉप 5मध्ये कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.