AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार खरंच तिसरी आघाडी करणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, महायुतीत आम्ही…

Anand Paranjpe on NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या निवडणुकीबाबत त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तसंच जयंत पाटील आणि रोहित पवारांवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर...

अजित पवार खरंच तिसरी आघाडी करणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, महायुतीत आम्ही...
अजित पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 31, 2024 | 2:56 PM
Share

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मूक आंदोलन केलं. त्यानंतर अजित पवार गट तिसरी आघाडी करणार असल्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट केलं. त्यानंतर या चर्चांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना त्यांच्या पक्षात जयंत पाटील हे फारस महत्व देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे फावला वेळ खूप आहे. मला माहित नाही त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आहे का? मात्र अशा प्रकारची कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. आम्ही महायुतीमध्येच निवडणूक लढू, असं आनंद परांजपे म्हणालेत.

महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय- परांजपे

षण्मुखानंद सभागृहात मेळावा पार पडला. तेव्हा स्पष्ट केलं होतं, की आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल. कोणीही आपली भूमिका स्पष्ट करू नये. तिन्ही पक्षाचे उत्तम समन्वय आहेत. अजित पवार जी भूमिका घेतात त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही , असंही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने कामाला सुरुवात होणार आहे. योजनांची माहिती आणि समस्या असल्यास थेट व्हाट्सअप आणि हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे, असंही आनंद परांजपे यांनी सांगितलं.

विरोधकांवर हल्लाबोल

शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र यांनी जाहीर माफी मागितली. त्यानंतर ही तर ‘राजकीय माफी’ विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. यावर आनंद परांजपेंनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या प्रकरणात कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माफी मागितली आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात. राहुल गांधींना माफी मागायला लावणार का? असा सवाल माझा संजय राऊत यांना आहे, असं म्हणत परांजपेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.