Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले

सध्या ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 

Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले
rain
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 8:58 AM

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. यामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या  गाड्यांचा वेग मंदावला आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे. (Thane Heavy Rain waterlogging in city)

ठाणे शहरात सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

सखल भागात पाणी साचले

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसाचा फटका ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरात देखील बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत.

यंदा ठाणे महापालिकेने नालेसफाई नीट न केल्यामुळे अनेक भागात पाणी साचत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पावसाचा जोर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा सकल भागात पालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पंप बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हवामान खात्याकडून सर्तकतेचा इशारा

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे. आज अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. तसेच हवामान खात्याने आधीच सर्तकतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच बसून राहावे, असे आवाहन केले जात आहे.

मुंबई, ठाण्यासह रायगडला रेड अलर्ट

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसण्याची शक्यता आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Thane Heavy Rain waterlogging in city)

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे, रायगडात अतिवृष्टीची शक्यता; सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा

Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain Live Updates | मान्सूनचे आगमन, मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.