AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे – उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे - उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 27, 2024 | 1:20 PM
Share

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय-बाय सरकार म्हणत आहे. साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. पण गेल्या दोन वर्षांत केलेल्या कोणत्याही घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. या सरकारला जरा जरी संवदेना असतूल तर गेल्या दोन वर्षांत जो घोषणांचा पाऊस पाडला त्यापैकी पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने सांगितलं तरी खूप आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अर्थसंकल्पाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्याचा घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, असं शिंदे म्हणाले होते. त्यांची पंचतारांकीत शेती आहे. अमावस्या पौर्णिमेला वेगळं पिक काढतात. हेलिकॉप्टरने ते जातात हा एकमेव शेतकरी. टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस नाही . दोन वर्षात सव्वा सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. रोज नऊ शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांना कोणी वाली नाही. १० हजार २२ कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. त्यांनी कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात परिस्थितीवेगळी आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येणं बाकी आहे. जानेवारीपासून आता पर्यंत १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

पीक विमाचे पैसे मिळत नाही. एक रुपयात पिकविम्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या हातात ७० रुपये आले आहेत. शेपटावर निभावलं. कसंबसं एनडीए सरकार आलं. डबल इंजिन सरकारने पीक कर्जाची माफी द्यावी. मी दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफी दिली होती. घोषणा आणि थापा मारू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीच्या आत माफी द्यावी. फडणवीस यांनी एक कर्जमुक्ती केली. तिची अंमलबजावणी अजून नाही.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं