AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे – उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

हे तर महागळती सरकार, लीकेज सरकार आहे - उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 27, 2024 | 1:20 PM
Share

हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय-बाय सरकार म्हणत आहे. साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. पण गेल्या दोन वर्षांत केलेल्या कोणत्याही घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. या सरकारला जरा जरी संवदेना असतूल तर गेल्या दोन वर्षांत जो घोषणांचा पाऊस पाडला त्यापैकी पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने सांगितलं तरी खूप आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अर्थसंकल्पाबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. उद्याचा घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, असं शिंदे म्हणाले होते. त्यांची पंचतारांकीत शेती आहे. अमावस्या पौर्णिमेला वेगळं पिक काढतात. हेलिकॉप्टरने ते जातात हा एकमेव शेतकरी. टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस नाही . दोन वर्षात सव्वा सहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. रोज नऊ शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांना कोणी वाली नाही. १० हजार २२ कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. त्यांनी कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात परिस्थितीवेगळी आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येणं बाकी आहे. जानेवारीपासून आता पर्यंत १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

पीक विमाचे पैसे मिळत नाही. एक रुपयात पिकविम्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या हातात ७० रुपये आले आहेत. शेपटावर निभावलं. कसंबसं एनडीए सरकार आलं. डबल इंजिन सरकारने पीक कर्जाची माफी द्यावी. मी दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफी दिली होती. घोषणा आणि थापा मारू नका. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून निवडणुकीच्या आत माफी द्यावी. फडणवीस यांनी एक कर्जमुक्ती केली. तिची अंमलबजावणी अजून नाही.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.