AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले, पण मराठा आरक्षणाचा मार्ग सरकारने काढला नाही – नरेंद्र पाटील

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले मात्र आरक्षणाचा मार्ग सरकारने काढला नाही. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसला धक्का लागता कामा नये हे उद्दव ठाकरेंना सांगितलं होतं.  मात्र त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं युक्तिवाद न झाल्यानं केसला स्थगिती मिळाली. ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही.

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले, पण मराठा आरक्षणाचा मार्ग सरकारने काढला नाही - नरेंद्र पाटील
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 22, 2021 | 4:58 PM
Share

पुणे- राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गंभीर चुकांमुळं मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारनं कोणत्याही प्रकारचे पुरेसे व गंभीर प्रयत्न केले नाहीत. ठाकरे सरकारने गेल्या मराठा समाजाची माफी मागावी. तसेच मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने कश्या प्रकारे मराठा समाजाची फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले 

सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले मात्र आरक्षणाचा मार्ग सरकारने काढला नाही. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसला धक्का लागता कामा नये हे उद्दव ठाकरेंना सांगितलं होतं.  मात्र त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं युक्तिवाद न झाल्यानं केसला स्थगिती मिळाली. ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपनं सारथी सारख्या संस्थेची स्थापना केली

मागील भाजप सरकारनं सारथी सारख्या संस्थेची स्थापना केली. यासंस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण- मुळा-मुलींना करिअरसाठी भरपूर मदत केली. मात्र महाविकास आघाडी सरकार येताच संस्थेच्या या कामाला पुरेसा निधी न देता कात्री लावण्याचे काम केले. इतकेच नव्हेतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करत भाजपने मराठ्यांच्या मुलांना स्वतः:च्या पायावर उभे राहायला शिकवले. परंतु सद्यस्थितीला यामहामंडळाचा कारभारही  ठप्प झालेला दिसून येथे आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारने अनेक आयोज आणल्या होत्या. मात्र त्या सर्व योजना आता ठप्प झालेल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने २०१८ साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती.

संबंधित बातम्या

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर\

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक