Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

राज्यात आज (11 जून) 3 हजार 607 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 97 हजार 648 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra ).

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 9:30 PM

मुंबई : राज्यात आज (11 जून) 3 हजार 607 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 97 हजार 648 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra ). आज दिवसभरात उपचारानंतर 1 हजार 561 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील एकूण 46 हजार 078 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात एकूण 47 हजार 968 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना चाचणीचं काम करत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 9 हजार 317 नमुन्यांपैकी 97 हजार 648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 73 हजार 606 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 493 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 28 हजार 66 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 152 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय ठाण्यात – 119 (मुंबई 97, मीरा-भाईंदर 9, कल्याण-डोंबिवली 7, नवी मुंबई 4, वसई-विरार 2), नाशिक – 5 (नाशिक 5), पुणे – 16 (पुणे 8, सोलापूर 8), कोल्हापूर – 1 (रत्नागिरी 1),औरंगाबाद – 8 (औरंगाबाद 6, हिंगोली 1, जालना 1), लातूर – 3 (लातूर 2, नांदेड 1) असे मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 102 पुरुष तर 50 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 152 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 85 रुग्ण आहेत, तर 54 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 13 जण 40 वर्षांखालील आहेत. या 152 रुग्णांपैकी 107 जणांमध्ये (70.3 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3 हजार 590 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 35 मृत्यू हे मागील 2 दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू 1 एप्रिल ते 8 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 117 मृत्यूंपैकी मुंबई 87, मीरा भाईंदर – 8, कल्याण डोंबिवली – 7, सोलापूर – 7 , नवी मुंबई – 4, नाशिक – 3 आणि वसई विरार 1 असे आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

पुण्यात महिनाभरात 504 बेड्स, 18 व्हेंटिलेटरसह अद्ययावत कोविड केंद्र सज्ज, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

माझ्या शरीरावर ‘कोरोना’ संशोधन करा, सोलापुरात पॅरोलवरील कैद्याचे पत्र

Total Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.