येरवडा तुरुंगातून साताऱ्यात आलेले दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह, 15 अन्य कैदी क्वारंटाईन

पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या दोन कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Prisoners infected with Corona Virus in Satara).

येरवडा तुरुंगातून साताऱ्यात आलेले दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह, 15 अन्य कैदी क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 1:07 AM

सातारा : कोरोना विषाणूंने तुरुंगातही शिरकाव केल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यात आज (2 मे) कोरोनाचे 5 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या दोन कैद्यांचाही समावेश आहे (Prisoners infected with Corona Virus in Satara). या दोन कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांच्या संपर्कातील 15 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः याची माहिती दिली आहे.

साताऱ्यात शुक्रवारी (1 मे) एकाच दिवसात कोरोनाचे 25 रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आज सकाळपर्यंत कोरोनाचे 5 नवीन रुग्णांची नोंद झाली. पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात 46 कैदी पाठवण्यात आले होते. या 46 कैद्यांपैकी 2 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे सातारा शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा कारागृहात खळबळ उडाली आहे.

आज नव्याने सापडलेल्या कोरोना बाधितांमध्ये कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोना बाधिताच्या निकवर्तीयाचाही समावेश आहे. तसेच फलटण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेले 1, कराड येथून कोरेगाव येथे प्रवास करुन आलेला 1 आणि पुण्यातून सातारा कारागृहात आलेल्या 2 कैद्यांचा यात समावेश आहे. जिल्हा कारागृहात मोठ्या संख्येने कैदी आहेत. अशातच पुण्याहून आणलेल्या कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्हा कारागृहात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

महाराष्ट्रात आज (2 मे) दिवसभरात 790 नव्या (Corona Victims In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली आहे. तर, आज राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी (Corona Victims In Maharashtra) सोडण्यात आलं आहे.

36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांचा आकडा 521 वर

आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता 521 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. आज मुंबईत 27 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यातील 1, औरंगाबादमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगालमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, आकडा 12,296 वर

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

मुंबईत मेडिकल सर्टिफिकेटसाठी मजुरांची रांग, घरी जाण्यासाठी कागदांची जुळवाजुळव

Prisoners infected with Corona Virus in Satara

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.