AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेवटी सरकारने निर्णय घेतलाच, 2 मंत्री संदेश घेऊन जरांगेंच्या भेटीला; काय होणार?

एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे मुंबईत येण्यावर ठाम असल्याने राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. जरांगे मुंबईत आल्यास तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! शेवटी सरकारने निर्णय घेतलाच, 2 मंत्री संदेश घेऊन जरांगेंच्या भेटीला; काय होणार?
manoj jarange patil and devendra fadnavis
| Updated on: Aug 27, 2025 | 2:52 PM
Share

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार असून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे मुंबईत येण्यावर ठाम असल्याने राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. जरांगे मुंबईत आल्यास तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्य सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारचे प्रतिनिधी निघाले, जरांगेंची भेट घेणार

मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच चालू केले आहे. यावेळी भगवे झेंडे घेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत. जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आलेच तर मोठी अडचण होऊ शकते, असे राज्य सरकारला वाटत आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सरकारने मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत या दोन नेत्यांना जरांगे यांची भेट घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते जरांगेंची घेणार असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊन आंदोलन करू नये, अशी विनंती ते करणार आहेत.

सरकारचा नेमका प्रस्ताव काय?

मिळालेल्या माहितीनुसार ही भेट अहिल्यानगर किंवा पुण्यात होणार आहे. जरांगे यांनी मुंबईत सध्या आंदोलन करू नये हा संदेश घेऊन हे दोन्ही नेते जरांगे यांना भेटणार आहेत. उदय सामंत थोड्याच वेळात अहिल्यानगरमध्ये पोहोचणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता विखे पाटील, उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतल्यावर या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? सरकारतर्फे नेमका काय प्रस्ताव ठेवला जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जरांगेंना मुंबईत येण्यास मनाई, पुढे काय होणार?

सध्या जरांगे यांचा ताफा पैठण फाट्याजवळ पोहोचला आहे. जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत येण्यास मनाई केली आहे. तसेच जरांगे यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांना ठाणे, नवी मुंबई या परिसरात कुठे जागा देता येईल, याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असेही निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर जरांगे यांनी आम्ही आता पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत, असे सांगत काहीही झाले तरी आम्ही मुंबईत जाणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. याआधी सरकारने 26 ऑगस्ट रोजी हैदराबाद गॅझेटविषयी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

Follow Us
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.