AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती; उद्धव ठाकरे यांचं ते पत्र वाचून दाखवत मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सोबतच त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचीच होती; उद्धव ठाकरे यांचं ते पत्र वाचून दाखवत मोठा गौप्यस्फोट
uddhav thackeray and devendra fadnavis
| Updated on: Oct 01, 2025 | 5:19 PM
Share

Uddhav Thackeray : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक अतिवृष्टीत वाहून गेले आहे. काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिके तर पूर्णपणे हातातून गेली आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मागण्या केल्या आहेत. दरम्यान, आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन  देवेंद्र फडणीस यांनी विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे. या पत्रात फडणवीस यांनी राज्य सरकारला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता याच पत्राचा दाखला देत ठाकरे यांनीदेखील सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली आहे.

मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत भाष्य केले. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या. “गेल्या आठवड्यात मी राज्यात पाहणी केली. लोकांना भेटलो. त्यानंतर तुमच्याशी बोललो. सरकारला विनंती केली की राजकारण न करता मार्ग काढावं. पण सरकारची तशी तयारी आहे हे वाटत नाही. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री पाकिटावर फोटो छापण्यात मग्न आहेत. जनता वाऱ्यावर आहे,” असी टीका ठाकरे यांनी केली.

बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं, तेव्हाच…

तसेच, आज बातमी आली. शेतकऱ्यांवर सरकारचा पूरभार. काही साखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि शेकडो करोडोंच्या कर्जावर त्यांनी थकहमी मिळवली. आम्ही गरिबांसाठी मागणी करत आहोत. ज्या शेतकऱ्यांना जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. त्याशिवाय कर्ज मिळत नाही, अशी हकिकत सांगून ठाकरेंनी फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहे का?

पुढे बोलताना, आज त्यांचं पीक उद् ध्वस्त झालं आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या येत आहेत. साखर सम्राट भाजपमध्ये गेल्यास त्याच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल तर साध्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये येण्याची वाट भाजप पाहत आहे का. शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीसांचं पत्र वाचून दाखवलं

दरम्यान, ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशीही मागणी त्यांनी केली. सोबतच विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी वाचून दाखवले. फडणवीसांनी तेव्हा सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.  हे पत्र जसंच्या तसं वाचून दाखवून ठाकरे यांनी फडणवीस यांनी आता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी केली.

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस