AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उंबरखिंड : छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धभूमी ते भारतातील सर्वात उंच ‘रोड केबल स्टेड ब्रिज’; 25 मिनिटे वाचणार

Umbarkhind : 1661 साली उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला होता आता तिथे भारतातील सर्वात उंच 'रोड केबल स्टेड ब्रिज' बांधला जात आहे.

उंबरखिंड : छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धभूमी ते भारतातील सर्वात उंच 'रोड केबल स्टेड ब्रिज'; 25 मिनिटे वाचणार
UmbarkhindImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 5:43 PM
Share

मुंबई : साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या सह्याद्री पर्वतरांगांत उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला होता, त्याच पर्वतरांगा आज पुन्हा एका नव्या लढ्याचे साक्षीदार बनत आहेत. मात्र त्या तलवारीऐवजी आता पोलाद, केबल आणि काँक्रीट या साधनांच्या बळावर ऊन, वारा, पाऊस, उंची आणि वेळ मर्यादा या घटकांशी लढत देत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज उभारण्यासाठी ॲफकॉन्सचे अभियंते सह्याद्रीच्या त्याच प्रदेशात निसर्गाशी झुंज देत आहेत, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनेला पराभूत केले होते.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चावणी गाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांनी 30000 मुघल सैनिकांना मात दिली. त्याच ठिकाणी आज ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते इतिहासातून प्रेरणा घेऊन भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज उभारत आहेत. हा ब्रिज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचा भाग असून जमिनीपासून तब्बल 132 मीटर उंच असेल. हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वे वरील प्रवास सुमारे 6 किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे 25 मिनिटांनी कमी होईल.

मात्र या प्रकल्पाचा प्रवास सोपा नाही. 2026 मध्ये पूर्ण होणारा हा ब्रिज सह्याद्रीच्या अतिशय कठीण आणि ऐतिहासिक परिसरात उभारला जात आहे. अरुंद कडे, तीव्र वारे, अचानक कोसळणारा पाऊस, घनदाट धुके या सर्वांचा सामना करत काम सुरू आहे. वाऱ्याचा वेग काही मिनिटांतच मंद वाऱ्यापासून ते ताशी १०० किमी वेगाने वाहतो. पावसाळ्यात, पावसामुळे सह्याद्रीच्या कडा पाण्याच्या थरात बदलतात. त्यामुळे काम तात्काळ थांबते. अचानक येणाऱ्या घनदाट धुक्यामुळे दृश्यमानता फक्त काही मीटरपर्यंत राहते.

Umbarkhind

अशा परिस्थितीत बांधकाम, वेल्डिंग आणि ब्रिजचे घटक जोडण्यासारख्या कामांसाठीही अत्यंत कौशल्य, धैर्य आणि संयमाची गरज असते. उंच दऱ्यांच्या कड्यावर उभे राहून अभियंते आणि कामगार जगातील सर्वोच्च सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांनुसार काम करत आहेत.

मुंबई–पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रोजेक्ट दोन पॅकेजमध्ये विभागला गेला आहे. पॅकेज I मध्ये 1.75 किमी आणि 8.92 किमी लांबीच्या दोन आठ-लेन बोगद्यांचा समावेश आहे. पॅकेज II मध्ये दोन आठ-लेन ब्रिजसह (850 मीटर आणि 650 मीटर लांबीचे), एक्सप्रेसवेचे रुंदीकरण (6 लेनवरून 8 लेन), तसेच 10 किमीहून अधिक पोच रस्त्यांचा समावेश आहे.

पॅकेज II मधील 650 मीटर लांबीचा ब्रिज हा भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज असणार आहे. याचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून केले जात आहे. या पुलाचे पायलॉन (स्तंभ) तब्बल 182 मीटर (597 फूट) उंच आहेत. ते मुंबईतील बांद्रा वरळी सी लिंकच्या 128 मीटर पायलॉनपेक्षाही उंच आहेत आणि भारतात रस्त्यावर बांधल्या जाणाऱ्या ब्रिजपैकी सर्वाधिक उंच आहेत.

पायलॉन शाफ्टचे बांधकाम वरच्या दिशेने सेल्फ-क्लायंबिंग शटरिंग सिस्टीम वापरून गुरुत्वाकर्षण आणि सह्याद्रीच्या तीव्र वाऱ्यांना झुगारून पूर्णत्वास नेले. डेक सेगमेंटच्या बांधकामासाठी 182 मीटर उंचीवर चार टॉवर क्रेन, प्रत्येकी 350-टन वजनाच्या आठ कॅन्टिलिव्हर फॉर्म ट्रॅव्हलर्स (CFTs) सोबत काम करतात. ते हळूहळू मोकळ्या जागेतून पुढे पुढे जात ब्रिजच्या डेक सेगमेंट एक एक करून बांधतात. दूरवरून दिसणारे 182 मीटरचे पायलॉन एका खोल दरीच्या वर उंच जाणाऱ्या ब्रिजचा भाग असतील आणि त्यासाठी प्रत्येक डेक सेगमेंट अधिक अचूकतेने बांधला जात आहे.

Umbarkhind History

एकेकाळी शिवाजी महाराजांच्या युद्धात सहयोगी असलेली सह्याद्री पर्वतरांग आता आधुनिक भारतातील अभियंत्यांच्या कल्पकतेला आव्हान देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीतीद्वारे याच भूप्रदेशात शत्रूवर मात केली, तर अभियंते अभियांत्रिकी संरचनेच्या माध्यमातून त्यावर विजय मिळवत आहेत.

प्रकल्पातील पॅकेज-2 विषयी माहिती

  • प्रकल्प: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक (पॅकेज-II)
  • ब्रिजची उंची: 132 मीटर (भारताचा सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज)
  • पायलॉन उंची: 182 मीटर
  • व्हायाडक्ट I: 850 मीटर
  • व्हायाडक्ट II (केबल-स्टेड): 650 मीटर
  • एक्सप्रेसवेचा विस्तार: 6 लेनवरून 8 लेनपर्यंत (5.86 किमी)
  • पोच रस्ते: 10.2 किमी

प्रकल्पाचे फायदे

  • प्रवास अंतर 6 किमीने कमी
  • प्रवास वेळ 25 मिनिटांनी कमी
  • इंधन बचत आणि प्रदूषणात घट
  • दररोज 1.5 लाख प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवास

उंबरखिंड – तेव्हा आणि आता

  • 1661 : उंबरखिंडची लढाई
  • 2 फेब्रुवारी 1661, अंबेनळी घाट परिसरात लढली गेली
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूठभर मावळ्यांनी कारतलब खानाच्या 30000 मुघल सैन्याचा पराभव केला
  • अरुंद घाटात सापळा रचून भूभागाचा रणनीतीने वापर
  • पर्वतांवरील प्रभुत्व आणि लढाईतील बुद्धिमत्तेचे प्रतीक

उंबरखिंड आता

  • ॲफकॉन्सचे अभियंते त्याच सह्याद्री पर्वतांना आधुनिक भारताच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक बनवत आहेत
  • ज्या भूमीवर इतिहास लिहिला गेला, तिथेच आता एक अभियांत्रिकी चमत्कार उभा राहत आहे.
Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...