AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी, नाशिकसह इतर ठिकाणी गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान

राज्यभरात शनिवारी (29 फेब्रुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.

राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी, नाशिकसह इतर ठिकाणी गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान
| Updated on: Mar 01, 2020 | 11:12 AM
Share

मुंबई : राज्यभरात शनिवारी (29 फेब्रुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली (Unseasonable Rain in Maharashtra). नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी आल्या. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सरकारच्यावतीने एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली असताना दुसरीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसानं थैमान घातलं. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीपासूनच विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. मुख्यतः सोलापूर शहरासह बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि जिल्ह्यातील इतर काही भागात वादळी पाऊस झाला. यात द्राक्ष, ज्वारीसह हाताशी आलेल्या अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रविवारी (1 मार्च) सकाळच्या सत्रातही मोहोळ तालुक्यातील शेटफळ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि तालुक्यातील काही भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. ध्यानीमनी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडावर अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसात खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गहू, हरबरा आणि कांदा पीक देखील गारपीटीमुळे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद आणि जालना येथे देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये जोरदार पाऊस बरसला. यात हरभरा, गहू, करडी, तूर आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि इतर काही परिसरात अवकाळी पाऊस झाला.

Unseasonable Rain in Maharashtra

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.