AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert: राज्यात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट

राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सून यंदा वेळेपूर्वीच देशात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु झाली आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. त्याचवेळी राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

Rain Alert: राज्यात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट
राज्यात अवकाळी पाऊस (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 24, 2025 | 8:12 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढील चार ते पाच दिवस असणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्याच्या दक्षिण कोकण किनार्‍यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा असणारा धोका टळला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने शनिवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिला होता. आता मागे घेत यलो अलर्ट जारी केला आहे. परंतु पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसचे मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज आहे, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने

राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

राज्यातील अनेक भागांत पाऊस

कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्गमध्ये रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलढाणा येथे अवकाळी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात मन्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार सुरू होती. अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यात सर्वात जास्त कांदा लागवडी करण्यात येते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

Follow Us
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.