AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Sabha Election : फडणवीसांच्या हातात आता फक्त 3 दिवस, भाजप ‘तो’ प्लॅन महाराष्ट्रातही लागू करणार?

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. मात्र बंडखोरांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. यावर आता कसा मार्ग निघणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vidhan Sabha Election : फडणवीसांच्या हातात आता फक्त 3 दिवस, भाजप 'तो' प्लॅन महाराष्ट्रातही लागू करणार?
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 01, 2024 | 9:20 PM
Share

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सध्या तरी बंडखोरी हीच महायुतीसमोरील राज्यातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना आयोजित बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राज्यात बंडखोरी टाळण्याच्या सूचना राज्यातील नेतृत्वाला करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील निवडणुका होणार आहेत.

दरम्यान झारखंडमध्ये ज्या नेत्यांना तिकीट मिळाले नव्हते, त्यांची बंडखोरी रोखण्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. त्यांनी बंडखोरांशी चर्चा करून त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या झारखंडच्या उलट स्थिती आहे. राज्यात भाजप सोबतच महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक जणांनी बंडखोरी केल्याचं पाहयला मिळत आहे. बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत.

एकीकडे फडणवीसांनी जागा वाटपाचा तिढा यशस्वीरित्या सोडवला आहे. मात्र आता पक्षांतर्गत झालेली बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. फडणवीसांनी देखील तिकीट न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान इच्छूक उमेदवारांच्या बंडखोरीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. भाजपमध्ये निर्माण झालेल्या या बंडखोरीचा फटका हा या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मित्रपक्षांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.

भाजप वापरणार झारखंडची रणनीती?

महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील निवडणूक होणार आहे. हे दोन्ही राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. झारखंडमध्ये बंडखोरी रोखण्यात भाजपला मोठ्याप्रमाणात यश आलं आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही बंडखोराचं बंड थंड झालं नाही. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सांगितलं की,आमच्या हातात अजून तीन दिवस आहे, ज्या ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली त्या -त्या मतदारसंघातील भाजपचे वरिष्ठ नेते बंडखोरांशी संवाद साधत आहेत.शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचे सर्व बंडखोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.