AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार

फडणवीसांनी त्यांचं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis).

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार
| Updated on: Jul 20, 2020 | 4:27 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी हे वजन वापरुन निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis and Cyclon relief work). यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचं काम आरोप करणं असतं. त्याचा खुलासा करण्याची आम्हाला संधी मिळते असं म्हणत फडणवीसांच्या आरोपांना फेटाळलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्यांचं काम आहे. त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. 18 जुलै रोजी फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केलाय, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. 18 जुलै रोजी प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे.”

“एनडीआरएफमधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. NDRF च्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

‘4 ऑगस्टपासून गडचिरोली-चंद्रपूरमधील शाळा सुरु होणार’

विजय वड्डेट्टीवार यांनी यावेळी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करणार असल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, “गडचिरोली, चंद्रपूरमध्ये गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यांमध्ये 90 टक्के पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यासाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत सॅनिटायझर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना एकमेकांपासून अंतरावर बसवले जाईल आणि शाळा सॅनिटायईज केल्या जातील”

“जिथे कंटेनमेंट झोन आहे, तिथे मात्र शाळा सुरु होणार नाहीत. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील,” असं वडेट्टीवार म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. MMR क्षेत्रातील महापालिका वगळून राज्यातील इतर भागातील निर्यातक्षम उद्योग सुरू होणार आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

जनतेने आमदारांना, तर आमदारांनी मला निवडून दिलंय, जयंत पाटलांनी धारिष्ट्य दाखवावं : गोपीचंद पडळकर

Tejas Thackeray | मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना

पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा

Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis and Cyclon relief work

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.