AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ध्यात सामाजिक संस्था अन्न-धान्य घेऊन घरो-घरी पोहोचल्या, मात्र विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची ओरड

लॉकडाऊनच्या काळात शाळांत शिल्लक असलेले पोषण आहाराचे तांदूळ आणि डाळी, कडधान्य वितरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते.

वर्ध्यात सामाजिक संस्था अन्न-धान्य घेऊन घरो-घरी पोहोचल्या, मात्र विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची ओरड
| Updated on: Apr 10, 2020 | 5:05 PM
Share

वर्धा : लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना धान्याची (Wardha School Nutritious Food) कमतरता भासू नये, याकरिता शाळांत शिल्लक असलेले पोषण आहाराचे तांदूळ आणि डाळी, कडधान्य वितरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि कडधान्य पुरविण्यात येते. मार्च महिन्याचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण हा आहार लॉकडाऊनमध्ये गर्दी न (Wardha School Nutritious Food) करता वाटायचा होता, वाटपाच्या काळात कुठे गर्दी पाहायला मिळाली तर कुठे तो विद्यार्थ्यांना मिळालाच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिक्षक तो आहार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी स्वतः पोहचवू शकले असते. जेव्हा विविध सामाजिक संस्था आणि संघटना गरजूपर्यंत धान्य घेऊन पोहचवत आहेत. तेथे आमचा शिक्षक का मागे रहावा? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सरकारी आदेशानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांतून तब्बल 331 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आठही पंचायत समितीत ग्रामीण भागात एकूण 1 हजार 106 शाळा आहेत. या शाळांत 69 हजार 297 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण हा अहवाल किती खरा आणि किती खोटा याची पाळताळणी करण्याचे आवाहन आता अधिकाऱ्यांसमोर आहे.

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्याकरिता शासनाने लॉकडाऊन (Wardha School Nutritious Food) लागू केले. या काळात या शाळांना सुट्टी देण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेत पोषण आहाराचे तांदूळ तसेच पडून ते खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील सर्वच कामे ठप्प झाली. त्यातही हाताला काम नसल्याने अनेकांच्या दोन वेळेच्या जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही शक्यता ओळखून शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार, जिल्ह्यातील एक शाळा वगळता इतर शाळांतून 3 लाख 31 हजार 428 किलो तांदूळ वितरित करण्यात आले. तर याच शाळांतून 8 हजार 206 किलो कडधान्य आणि डाळींचे वितरण करण्यात आल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार, सर्वच शाळांनी शिल्लक धान्याचे वितरण केले असे दिसते. वास्तवात तसे नसल्याची चर्चा जोरात असून शिक्षणाधिकाऱ्यांनी याची चौकशी केल्यास तांदळाचा मोठा घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.

शासनाने ग्रामीण भागातील सर्वच शाळांत शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतून शिल्लक धान्याचे वितरण झाले. परंतु, अपवाद वगळता बऱ्याच खासगी शाळांमध्ये हा वाटप कागदावरच झाल्याची चर्चा जोरात आहे. यात वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शाळांचा आकडा मोठा असल्याची चर्चा शिक्षण विभागातच आहे. कागदावरील आकड्यांच्या जुळवाजुवित शिक्षक पटाईत आहेत. त्यामुळे कागदावरच हा वाटप निपटविण्यात आल्याची (Wardha School Nutritious Food) चर्चा जोर धरु लागली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.