AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
पूरग्रस्त महिलांशी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस.
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 6:59 PM
Share

वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) येथील महिला आक्रमक झाल्या. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आम्हाला दोन शब्द लिहून द्या, अशी मागणी महिलांनी केली. आमदार, खासदार असूनही अजून आमचं पुनर्वसन (Rehabilitation) झालेलं नाही. तुम्ही आमचं पुनर्वसन करून द्या. आमचं घर, दार पाण्याखाली डुबलेलं आहे. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी महिला करत होत्या. आम्हाला प्लाट घेऊन आमच्यासाठी घर बांधून द्यावं, असं महिला म्हणत होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांचं म्हणण ऐकूण घेत होते. त्यानंतर फडणवीस म्हणाले, मी जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात सांगतो आहे. हो पुनर्वसन झालं पाहिजे. मी सांगतो, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शांत केलं.

पाहा व्हिडीओ

महिलांना सांगितली आपबिती

पुराने वेढा दिला होता. कान्होलीच्या 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. त्या पूरग्रस्तांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमधून बाहेर आले. त्यानंतर चर्चा करीत होते. महिलांचा आक्रोश होता. जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात सांगत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महिला म्हणाल्या, आम्हाला तसे दोन शब्द लिहून द्या. आमचे लहान-लहान मुलं आहेत. आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या. हिंगणघाट तालुक्यात कानोली ग्रामपंचायतीसमोर बोलत होते. आमच्या गावात शाळेची सोय नाही, गाडीची सोय नाही. प्रशासन काहीच करत नाही, असं वर्षा इटनकर म्हणाल्या.

योग्य ती मदत करण्याचे आश्वासन

देंवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त महिलांशी चर्चा केली. फडणवीस म्हणाले, पाणी खरचं गेलं का, याची माहिती घेऊ. चौकशी करू. त्यानंतर सर्वे करून योग्य ती मदत करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. गेल्यावर्षीही पूरग्रस्तांचा सर्वे झाला होता. परंतु, त्यावेळी मदत मिळाली नाही. यावेळी मदत मिळते काय. पुनर्वसन होतं का, हे पाहावं लागेल.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.