AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
पूरग्रस्त महिलांशी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 19, 2022 | 6:59 PM
Share

वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) येथील महिला आक्रमक झाल्या. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आम्हाला दोन शब्द लिहून द्या, अशी मागणी महिलांनी केली. आमदार, खासदार असूनही अजून आमचं पुनर्वसन (Rehabilitation) झालेलं नाही. तुम्ही आमचं पुनर्वसन करून द्या. आमचं घर, दार पाण्याखाली डुबलेलं आहे. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी महिला करत होत्या. आम्हाला प्लाट घेऊन आमच्यासाठी घर बांधून द्यावं, असं महिला म्हणत होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांचं म्हणण ऐकूण घेत होते. त्यानंतर फडणवीस म्हणाले, मी जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात सांगतो आहे. हो पुनर्वसन झालं पाहिजे. मी सांगतो, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शांत केलं.

पाहा व्हिडीओ

महिलांना सांगितली आपबिती

पुराने वेढा दिला होता. कान्होलीच्या 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. त्या पूरग्रस्तांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमधून बाहेर आले. त्यानंतर चर्चा करीत होते. महिलांचा आक्रोश होता. जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात सांगत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महिला म्हणाल्या, आम्हाला तसे दोन शब्द लिहून द्या. आमचे लहान-लहान मुलं आहेत. आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या. हिंगणघाट तालुक्यात कानोली ग्रामपंचायतीसमोर बोलत होते. आमच्या गावात शाळेची सोय नाही, गाडीची सोय नाही. प्रशासन काहीच करत नाही, असं वर्षा इटनकर म्हणाल्या.

योग्य ती मदत करण्याचे आश्वासन

देंवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त महिलांशी चर्चा केली. फडणवीस म्हणाले, पाणी खरचं गेलं का, याची माहिती घेऊ. चौकशी करू. त्यानंतर सर्वे करून योग्य ती मदत करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. गेल्यावर्षीही पूरग्रस्तांचा सर्वे झाला होता. परंतु, त्यावेळी मदत मिळाली नाही. यावेळी मदत मिळते काय. पुनर्वसन होतं का, हे पाहावं लागेल.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...