AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या.

Video Devendra Fadnavis : आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, आम्हाला दोन शब्द लिहून द्या, वर्ध्यात महिला आक्रमक, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
पूरग्रस्त महिलांशी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस.
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 6:59 PM
Share

वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) येथील महिला आक्रमक झाल्या. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. आम्हाला दोन शब्द लिहून द्या, अशी मागणी महिलांनी केली. आमदार, खासदार असूनही अजून आमचं पुनर्वसन (Rehabilitation) झालेलं नाही. तुम्ही आमचं पुनर्वसन करून द्या. आमचं घर, दार पाण्याखाली डुबलेलं आहे. आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, अशी आग्रही मागणी महिला करत होत्या. आम्हाला प्लाट घेऊन आमच्यासाठी घर बांधून द्यावं, असं महिला म्हणत होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांचं म्हणण ऐकूण घेत होते. त्यानंतर फडणवीस म्हणाले, मी जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात सांगतो आहे. हो पुनर्वसन झालं पाहिजे. मी सांगतो, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शांत केलं.

पाहा व्हिडीओ

महिलांना सांगितली आपबिती

पुराने वेढा दिला होता. कान्होलीच्या 400 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. त्या पूरग्रस्तांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीमधून बाहेर आले. त्यानंतर चर्चा करीत होते. महिलांचा आक्रोश होता. जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात सांगत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महिला म्हणाल्या, आम्हाला तसे दोन शब्द लिहून द्या. आमचे लहान-लहान मुलं आहेत. आम्ही मरता मरता वाचलो. त्यामुळं आमचं पुनर्वसन करून द्या. त्याबद्दल दोन शब्द लिहून द्या, असा आग्रह महिला करत होत्या. हिंगणघाट तालुक्यात कानोली ग्रामपंचायतीसमोर बोलत होते. आमच्या गावात शाळेची सोय नाही, गाडीची सोय नाही. प्रशासन काहीच करत नाही, असं वर्षा इटनकर म्हणाल्या.

योग्य ती मदत करण्याचे आश्वासन

देंवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त महिलांशी चर्चा केली. फडणवीस म्हणाले, पाणी खरचं गेलं का, याची माहिती घेऊ. चौकशी करू. त्यानंतर सर्वे करून योग्य ती मदत करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. गेल्यावर्षीही पूरग्रस्तांचा सर्वे झाला होता. परंतु, त्यावेळी मदत मिळाली नाही. यावेळी मदत मिळते काय. पुनर्वसन होतं का, हे पाहावं लागेल.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....