AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘जुनी पेन्शन’ योजनेबाबत नेमकी घोषणा काय ?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'जुनी पेन्शन' योजनेबाबत नेमकी घोषणा काय ?
CHIEF MINISTER EKNATH SHINDE Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 20, 2023 | 7:07 PM
Share

मुंबई : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आणि सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना यांनी ‘जुनी पेन्शन’ योजनेबाबत १४ मार्चपासून संपाची हाक दिली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करत आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आणि सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना यांनी १४ मार्च २०२३ पासून संप पुकारला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनीही २८ मार्च २०२३ पासून संपावर जाण्याबाबत शासनाला नोटीस दिली आहे.

राज्यात सुरु असलेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासन पूर्णतः सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.

समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर राज्य शासन उचित निर्णय घेईल. तसेच, जुनी पेन्शन योजना यात कोणतीही तफावत राहणार नाही. त्यामुळे हा संप मागे घेण्यात यावा असे आवाहन केले. राज्य शासनाच्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यासमोर आज अनेक आव्हाने आहेत. अशावेळी संप करणे योग्य नाही अशी भूमिका त्यांना पटवून दिली. राज्यसमोर असलेल्या या आव्हानांचा विचार करून राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने निर्णय घेत संप मागे घेतला. त्यांच्या या संवेदनशीलतेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...