AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे त्यावेळी ‘मूक’मोर्चाला काय म्हणाले होते? सुधीर मुनगंटीवार यांची नेमकी टीका काय?

जालना येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशी घटना व्हायला नको होती. स्वतः मुख्यमंत्री त्या आंदोलकांशी बोलले होते. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत चर्चा न करता कायदे पास केले होते असे सांगितले.

उद्धव ठाकरे त्यावेळी 'मूक'मोर्चाला काय म्हणाले होते? सुधीर मुनगंटीवार यांची नेमकी टीका काय?
SUDHIR MUNGANTIWAR AND SANJAY RAUT Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 02, 2023 | 6:13 PM
Share

हिंगोली : 2 सप्टेंबर 2023 | उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा मूकमोर्चा निघाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले. तर, त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काय लिहिले होते याची आठवण करून देत राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती होते. त्यावेळी ते बोलत होते.

हिंगोली येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूंचे दर्शन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने हिंगोली येथील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीमार हा निंदनीय असल्याचे सांगितले.

त्यानंतर नवीन सरकार राज्यात आले. त्यांनी न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. योग्य बाजू मांडण्यास ते कमी पडले. त्यामुळेच आज ही वेळ आली आहे. पण, सरकार पूर्णपणे मराठा आंदोलकांसोबत आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा…

जालना येथील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. पण, तेच चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचे मराठा समाजावर प्रेम नव्हतं? आता इथे गेले नाही तर राजकारण कसं? येथे तर जावंच लागेल. काही लोक तर रात्री अडीच वाजता पोहोचले असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

जालना येथील झालेल्या लाठीचार संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारवर टीका केली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाचा मूकमोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काय शब्द प्रयोग केला हे तुम्हाला माहित आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांच्यावरही टीका

राज्यात अशा घटना घडत असताना ते ज्या वेगात जातात तेव्हा त्यांनी जे मूक मोर्चा होता तेव्हा काय शब्द प्रयोग केला ते तुम्हाला माहित आहे. ते आता राजकारण करतील. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. संजय राऊत तुमच्या सामनामध्ये अप्रत्यक्षपणे तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाला काय म्हणता..? ते माहित आहे. ते विसरला का? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.