AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर हादरलं! अख्खं कुटुंब अचानक गायब, कारण समोर येताच मोठी खळबळ

पोलिसांना हाती लागलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. परंतु पुण्यातून हे कुटुंब नेमके कुठे गेले,याची कोणालाही कल्पना नाही.

नागपूर हादरलं! अख्खं कुटुंब अचानक गायब, कारण समोर येताच मोठी खळबळ
nagpur policeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 4:13 PM
Share

Nagpur Family Missing : नागपुरात एक विचित्र घटना घडली आहे. येथे एक अख्खं कुटुंबच गायब झालं आहे. अनेक ठिकाणी शोध घेऊनही या कुटुंबातील सदस्य सापडत नाहीयेत. विशेष म्हणजे पोलीसदेखील या कुटुंबाचा शोध घेत असून त्यांनाही यात अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, कुटुंबातील संपूर्ण सदस्यच नाहीसे झाल्यानंतर नागपुरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार धंतोली परिसरात तक्रारदार ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांचे कुटुंब राहते. त्याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्य राहतात. या कुटुंबातील 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि 12 वर्षीय कृष्णा यांचा समावेश आहे. हेच संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाले आहे.

ओळखीच्या व्यक्तीकडे शोधाशोध करून…

तक्रारीत नमूद केल्यानुसार 24 जूनपासून सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य अचानक घरातून निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नाही. एका सदस्यावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती पुढे आली आहे. नातेवाईकांसह ओळखीच्या व्यक्तीकडे शोधाशोध करूनही कोणताही माहिती लागला नसल्याने नातेवाईक शामसुंदर परसवाणी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल नोंदवली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला तपास सुरू केला आहे.

टोकाचा निर्णय तर घेतलेला नाही ना?

पोलिसांना हाती लागलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. परंतु पुण्यातून हे कुटुंब नेमके कुठे गेले. या कुटुंबाने नेमकं काय केल? त्यांनी काही टोकाचा निर्णय तर घेतलेला नाही ना? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कर्जाची परतफेड करता आली नसल्यामुळे ही लोक बेपत्ता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती