AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : माझं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; सर्वात मोठा आरोप काय?

"आपल्याकडे एकापेक्षा अधिक उमेदवार असतात. एकापेक्षा एक तोलामोलाचे असतात. निवडणं कठिण असतं. पदाधिकारी नेमताना दोन दोन चार चार लोकं असतात. चार लोक आल्यावर एकालाच पद देऊ शकतो. एकाला दिलं तर बाकीचे नाराज होतात. तुमच्यापैकी अनेकांना मी काहीच दिलं नाही. तरी तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्ही एकदा माझ्या खुर्चीत बसून बघा. मग तुम्हाला कळेल काय असतं. शिवसेनेत नाही करता आलं तर युवासेनेत काम करा" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : माझं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; सर्वात मोठा आरोप काय?
Uddhav Thackeray Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 1:57 PM
Share

“अरविंद तुम्ही केंद्रीय मंत्री होता आणि मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आपण काय-काय केलं आणि काय-काय होऊ दिलं नाही, त्या बद्दल सांगितलं, हाच मुद्दा आहे. ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की, दिल्लीला बसलेले दोन भाजपवाले फसवतायत. मी अरविंदला फोन केला. त्याला सांगितलं राजीनामा द्यावा लागेल. त्यावर अरविंदने कशासाठी? माझं काय चुकलं? असं न विचारता, येस सर बोलून राजीनामा देऊन आले” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज दादर येथे आयोजित भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडाळातून राजीनामा देतोय, पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना त्याला विचारावस वाटलं नाही की, का राजीनामा देतोय. इथे भाजपच्या मनातल्या काळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यांना अरविंद नको होता. कारण बिल पास करायला विरोध करणारा गेलेला बरा. अरविंदने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ना अरविंदला थांबवलं, ना मला फोन केला” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “मी मुख्यमंत्री झाल्यावर मी ते बिल अडवलं. मग मी असलेला कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे आहेत. मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा. म्हणून त्यांनी माझं सरकार पाडलं. तुमचं सरकार पाडलं. काळ कृत्य करून त्यांनी तुमच्या हक्काचं सरकार या कारणाने पाडलं” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे

“विभागात जे काही पदाधिकारी नेमाल, त्याने कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर ती पेटवू देणार नाही. त्याने शिवसेनेसोबतच राहिले पाहिजे. काही दिवसात जे लक्षात आलं. पूर्वी हॉटेल शहरी भागात होती. आता हॉटेल उपनगरात जातात. उपनगरातील आपले पदाधिकारी शिवसैनिक लागतातच. उद्योग धंदा किंवा नोकरी ही शाखेच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. आपली माणसं त्यात भरली पाहिजे. पदाधिकाऱ्यांना दंडक असला पाहिजे, अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय उघडा. पण आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे. काही कामगार कंपनीत कामगार सेनेत असतात, बाहेर मात्र इतर पक्षात असतात. हे चालणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही

“शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी ही शिवसेना आहे. मराठी माणसासाठी ही शिवसेना आहे. त्यात भेदाभेद होणार असेल तर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काही लागलं तरी शाखेसोबत तुमचा समन्वय असलाच पाहिजे. स्थानिक पातळीवर ज्यांना पद देता आलं नाही तर त्याला घेऊ नका. पण ज्याला कामगार कायदे कळतात त्या शिवसैनिकांना पदावर नेमा. हे स्वच्छ ठेवा” अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी