AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : माझं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; सर्वात मोठा आरोप काय?

"आपल्याकडे एकापेक्षा अधिक उमेदवार असतात. एकापेक्षा एक तोलामोलाचे असतात. निवडणं कठिण असतं. पदाधिकारी नेमताना दोन दोन चार चार लोकं असतात. चार लोक आल्यावर एकालाच पद देऊ शकतो. एकाला दिलं तर बाकीचे नाराज होतात. तुमच्यापैकी अनेकांना मी काहीच दिलं नाही. तरी तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्ही एकदा माझ्या खुर्चीत बसून बघा. मग तुम्हाला कळेल काय असतं. शिवसेनेत नाही करता आलं तर युवासेनेत काम करा" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : माझं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले; सर्वात मोठा आरोप काय?
Uddhav Thackeray Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 1:57 PM
Share

“अरविंद तुम्ही केंद्रीय मंत्री होता आणि मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आपण काय-काय केलं आणि काय-काय होऊ दिलं नाही, त्या बद्दल सांगितलं, हाच मुद्दा आहे. ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की, दिल्लीला बसलेले दोन भाजपवाले फसवतायत. मी अरविंदला फोन केला. त्याला सांगितलं राजीनामा द्यावा लागेल. त्यावर अरविंदने कशासाठी? माझं काय चुकलं? असं न विचारता, येस सर बोलून राजीनामा देऊन आले” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज दादर येथे आयोजित भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडाळातून राजीनामा देतोय, पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना त्याला विचारावस वाटलं नाही की, का राजीनामा देतोय. इथे भाजपच्या मनातल्या काळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यांना अरविंद नको होता. कारण बिल पास करायला विरोध करणारा गेलेला बरा. अरविंदने राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ना अरविंदला थांबवलं, ना मला फोन केला” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “मी मुख्यमंत्री झाल्यावर मी ते बिल अडवलं. मग मी असलेला कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे आहेत. मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा. म्हणून त्यांनी माझं सरकार पाडलं. तुमचं सरकार पाडलं. काळ कृत्य करून त्यांनी तुमच्या हक्काचं सरकार या कारणाने पाडलं” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे

“विभागात जे काही पदाधिकारी नेमाल, त्याने कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर ती पेटवू देणार नाही. त्याने शिवसेनेसोबतच राहिले पाहिजे. काही दिवसात जे लक्षात आलं. पूर्वी हॉटेल शहरी भागात होती. आता हॉटेल उपनगरात जातात. उपनगरातील आपले पदाधिकारी शिवसैनिक लागतातच. उद्योग धंदा किंवा नोकरी ही शाखेच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. आपली माणसं त्यात भरली पाहिजे. पदाधिकाऱ्यांना दंडक असला पाहिजे, अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय उघडा. पण आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत जायला पाहिजे. काही कामगार कंपनीत कामगार सेनेत असतात, बाहेर मात्र इतर पक्षात असतात. हे चालणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही

“शिवसेना ही केवळ वापरा आणि फेकासाठी नाही. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी ही शिवसेना आहे. मराठी माणसासाठी ही शिवसेना आहे. त्यात भेदाभेद होणार असेल तर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काही लागलं तरी शाखेसोबत तुमचा समन्वय असलाच पाहिजे. स्थानिक पातळीवर ज्यांना पद देता आलं नाही तर त्याला घेऊ नका. पण ज्याला कामगार कायदे कळतात त्या शिवसैनिकांना पदावर नेमा. हे स्वच्छ ठेवा” अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.