AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास; धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप

आजरा तालुक्यातील उचंगी धरणाचे काम हे अंतिम टप्यात आले असून यावर्षी धरणात पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तर त्याबाबतीत योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील मंत्र्यांनी दिल्या आहेत.

पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास; धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप
चाफवडे Image Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2022 | 7:31 PM
Share

आजरा (कोल्हापूर) : आजरा (Ajra) तालुक्यातील शेतीचा प्रश्न सुटण्यासाठी उचंगी धरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे काम गेले 20 वर्षांपासून सुरू असून गेल्या काही वर्षांपासून याकामाला गती आली होती. त्यामुळे 20 वर्षांपासून रखडलेल्या घरणात यावर्षी पाणी साठविण्यास सुरूवात होणार आहे. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल आहे. त्यामुळे धरण (Uchangi dam) क्षेत्रात आता पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तर चाफवडे गावाला लागणाऱ्या शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा यावर्षी धरणाच्या पाण्यामुळे सुटणार आहे. मात्र यामुळे गावातील अनेकांची घरे यात बुडणार आहेत. त्यामुळे अनेकांनी आपले साहित्य हलवण्यासाठी तयारी ही केली आहे. तर काही आपले साहीत्य हलविण्यासाठी धडपडत आहेत. याच धांदलीत येथे एका धरणग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये (Project affected) संतापाची लाट उसळली आहे. तर रंजना अशोक धडाम (वय 50) असे मृत धरणग्रस्त महिलेचे नाव आहे. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. तर त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आजरा तालुक्यातील उचंगी धरणाचे काम हे अंतिम टप्यात आले असून यावर्षी धरणात पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तर त्याबाबतीत योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील मंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे चाफवडे गावातील लोकांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र चाफवडे गावातील लोकांचे पुनर्वसन अजून करण्यात आलेले नाही. त्याच अगोदर घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा अट्टाहास जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप गावातील लोकांनी केला आहे.

यादरम्यान धरणात पाणी साठवल्यास गावातील काही घरे ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहित्य हलवण्यासाठी धरणग्रस्तांची धडपड सुरू आहे. तर रंजना धडाम यांचे घर देखील या वर्षी धरणात बुडणार आहे. त्यामुळे त्यांनी घरातील साहित्य इतरत्र हलवायला सुरुवात केलीय. राहते घर सोडून जावे लागत असल्याने रंजना धडाम अस्वस्थ होत्या. काल घरावरील पत्रे काढत असताना त्यांना चक्कर आली आणि त्या खाली काढून ठेवलेल्या पत्रांवर कोसळल्या. डोक्याला इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हा दुर्दैवी प्रकार असल्याने प्रकल्पग्रस्तांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुनर्वसन होण्याआधीच घाईगडबडीने धरणात पाणी साठवण्याचा अट्टाहास जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांनी केलाय. या अट्टाहासापायीच धरणग्रस्त महिलेचा बळी गेल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

दरम्यान रंजना धडाम त्यांना उपचारांसाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अशोक गंगाराम धडाम यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.