AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…या यात्रेत आणखी लाखो लोक चालतील, राहुल गांधींचा भारत जोडोवर विश्वास

, द्वेष, भय आणि हिंसा पसरवली जात आहे. त्या विरोधात ही यात्रा असल्याचे सांगत आरएसएस, भाजपा यांच्याकडून समाजात प्रथम भय पसरवले जाते मग द्वेष पसरवतात अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

...या यात्रेत आणखी लाखो लोक चालतील, राहुल गांधींचा भारत जोडोवर विश्वास
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 8:38 PM
Share

वाशिमः काँग्रेसची भारत जोडो यात्रेला सध्या उदंड प्रतिसाद लाभत असल्याचा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मिळत आहे. भारत जोडो यात्रेबद्दल माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. आणि ती जम्मू काश्मीरपर्यंत जाणार आहे. त्याबरोबरच या यात्रेत लाखो लोक चालले आहेत आणि लाखो लोक सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी सांगितले की, द्वेष, भय आणि हिंसा पसरवली जात आहे. त्या विरोधात ही यात्रा असल्याचे सांगत आरएसएस, भाजपा यांच्याकडून समाजात प्रथम भय पसरवले जाते मग द्वेष पसरवतात अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

येथील शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरुवात करतो तरीही भाजपकडून शेतकऱ्यांना भयभीत केले जात आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विमा देण्यात येतो मात्र ते खाजगी कंपनीला देतात, शेतकऱ्यांना त्यांचेच पैसे मिळतत नाहीत अशी टीकाही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे खाजगी कंपन्यांच्या खिशात घातले जात आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांवर पीक विकण्याची वेळ येते आहे. तरीही निर्यात बंद करुन आयात सुरू केली जाते असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.

राहुल गांधी यांनी कर्जमाफीवरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी सरकार अरबपतींचे कर्ज दोन मिनिटात माफ करतात मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. डिझेल-पेट्रोल, गॅसचे दर प्रचंड वाढवले जातात.

नरेंद्र मोदी सांगतात की, यूपीएच्या काळात सिलेंडर 450 म्हणून टीका करत होते. तर आज 1200 रुपये सिलिंडर आहे. त्याचे पैसे कुठे जाताता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.