AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Flood : आर्णी शहरात शिरले पुराचे पाणी, नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसळली दरड, फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. त्यामुळं वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाट हे वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Yavatmal Flood : आर्णी शहरात शिरले पुराचे पाणी, नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसळली दरड, फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प
आर्णी शहरात शिरले पुराचे पाणीImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 6:41 PM
Share

यवतमाळ : विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (Arni) शहरात पुराचे पाणी शिरल्यानं नागरिकांची (Citizen) त्रेधातीरपट उडाली. नागपूर-तुळजापूर महामार्गावर दरड कोसळली. त्यामुळं काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. फुलसावंगी ते ढाणकी वाहतूक ठप्प पुरामुळं ठप्प झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्रीपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला. शहरातील अरूनावती (Arunavati) नदी दुथळी वाहत आहे. नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात शिरले. आर्णी शहरातील अनेक प्रभागात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तसेच नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी सावधगिरी म्हणून वाहन चालकांना थांबण्याचा सल्ला दिला आहे. दरड कोसळत असताना मोठ मोठे दगड वरून खाली पडत असल्याने वाहन चालक लांबूनच वाहन थांबवून बसले आहे.

कोसदनी घाटात दरड कोसळली

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. त्यामुळं वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाट हे वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात नेहमीच या ठिकाणी दरड कोसळत असल्याचा घटना घडताय. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. अशात नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात दरड कोसळली. वनवे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसर्‍या बाजूचीदेखील दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.

नवनिर्मित पर्यायी पूल गेला वाहून

फुलसावंगी ते ढाणकी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. ठिकठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी पर्यायी बनवलेला पुल पावसाने वाहून गेला. मुसळधार पावसाने येथील ढाणकी ते फुलसावंगी रस्त्यावरील पुल निर्मितीचे काम सुरू आहे. पुलासाठी पर्याय म्हणून बाजूनेच एका तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसाने सदरील पुल वाहून गेला. त्यामुळे वाहतूक दिवसभर बंद होती. तसेच शेतात जाणाऱ्या येणाऱ्यांना शेतकऱ्यांना या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीस संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर माती असल्याने वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला. विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून पर्यटकांची धाव घेतली. सेल्फी फोटो काढून पर्यटक आनंद घेत आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.