AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तूंचे दर वाढणार, भावात 5 ते 10 टक्क्यांची वाढ, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

देशात असलेला सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या मालाचे दर यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तुंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने मजुरीचा देखील खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादकाला आता पूर्वीच्या किमतीमध्ये वस्तूंची विक्री करणे परवडत नाही.

एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तूंचे दर वाढणार, भावात 5 ते 10 टक्क्यांची वाढ, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 6:45 AM
Share

नवी दिल्ली : देशात असलेला सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या मालाचे दर यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तुंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने मजुरीचा देखील खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादकाला आता पूर्वीच्या किमतीमध्ये वस्तूंची विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात फ्रिज, वाशिंग मशिन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या दरामध्ये येत्या एप्रिलपर्यंत पाच ते दहा टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पॅरासॉनिक, एलजी, हायर या कंपन्यांनी या आधीच दरवाढिचा निर्णय घेतला आहे. तर सोनी, हिताची, गोदरेज या कंपन्या देखील लवकरच आपल्या वस्तूंचे दर वाढू शकतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

कझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अप्लायंसेस मॅनिफ्याक्चरर्स असोसिएशन (CEAMA)ने दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्या येत्या जानेवारी ते एप्रिल या काळात आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याची शक्यत आहे. हायर अप्लायंसेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एन. एस. यांनी याबाबत माहिती देताना पीटीआयला सांगितले की, देशात सध्या सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. कच्च्या मालाचे भाव सासत्याने वाढत आहेत. महागाई वाढल्याने निर्मिती खर्च देखील वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनाचे दर वाढू शकतात. दर वाढल्यास टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशिन अशा सर्वच उत्पादनाच्या किमती वाढतील. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

कोरोनाचा उत्पादनाला फटका

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. तसेच कोरोना काळात उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याने कंपन्यांना मोठा फटका बसला होता. आता हळूहळू कोरोनाचे सावट कमी होत असल्याने उद्योग-धंद्यांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्या काही प्रमाणात उत्पादनाचे दर वाढून झालेला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात वस्तूंचे दर महागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Mukesh Ambani | 728 कोटींमध्ये खरेदी केलेलं अंबानींचं न्यूयॉकमधील आलिशान हॉटेल पाहिलात का? भारीच आहे!

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित आहात? कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे कर्ज तुमच्यासाठी योग्य ठरेल,आजच जाणून घ्या !!

‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.