AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन

अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मुंबईकरांना मास्क न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन
| Updated on: Oct 02, 2020 | 6:20 PM
Share

मुंबई : लोकांनी मास्क वापरू नये यासाठी अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मरीन ड्राईव्ह येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येत मास्क न घालताच आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबईकरांना मास्क फ्री जगू द्या, अशी मागणी मांडली. (don’t use masks Akhil Bhartiya swasthya abhiyan Appeals to Mumbaikars)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोरोना एक फार्स आहे. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. यामाध्यमातून लोकांची मोठी फसवणूक होत आहे. लोकांना घाबरवलं जात आहे. लोक घाबरतात आणि त्यामुळे मास्क वापरतात. परंतु सतत मास्क वापरल्याने कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीरात जातो. त्यामुळे यकृत खराब होतं. कॅन्सरही होऊ शकतो. यकृत स्वस्थ ठेवण्यासाठी लोकांनी मास्क वापरणे बंद केले पाहीजे.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, घरगुती डाएटनेच कोरोनावर मात करता येईल. परंतु लोकांच्या मनात भीती पेरून आयटी कंपन्या आणि अमेरिकेसारखे देश स्वहित पाहत आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, आपल्याला पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही. कोरोनावरील लस, मास्क, कॅशलेस सेवा यापैकी कशाचीही गरज नाही.

जर मास्कने कोरोनाला रोखता येतं तर मग सहा फुटांपर्यंतचं फिजिकल डिस्टन्स कशाला? फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनापासून बचाव करता येत असेल तर मास्क कशाला? मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनाला रोखता येत असेल तर लॉकडाऊनची गरज काय? मास्क फिजिकल डिस्टन्स आणि लॉकडाऊन या तिन्ही गोष्टी कोरोनाला थोपवू शकतात तर मग लस कशाला हवी? असे अनेक प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या

चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रोज 1100 लोकांचा मृत्यू

‘कोरोना झाल्यास ममता बॅनर्जींना मिठी मारेन’, इशारा देणारा भाजप नेता कोरोना पॉझिटिव्ह

(don’t use masks Akhil Bhartiya swasthya abhiyan Appeals to Mumbaikars)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.