AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1954 मध्ये मौनी अमावस्याच्या दिवशीच पसरली होती अफवा, चेंगराचेंगरीत झाला होता 800 जणांचा मृत्यू

Mahakumbh Mela Stampede: 1954 च्या कुंभवेळी चेंगराचेंगरी घटनेनंतर पंडित नेहरू यांनी न्यायमूर्ती कमलाकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नेहरू यांनी राजकीय नेते आणि व्हीआयपींना कुंभ स्नानाच्या उत्सवात न जाण्याचे आवाहन केले होते.

1954 मध्ये मौनी अमावस्याच्या दिवशीच पसरली होती अफवा, चेंगराचेंगरीत झाला होता 800 जणांचा मृत्यू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 30, 2025 | 9:16 AM
Share

मौनी अमावस्याच्या दिवशी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्या. या घटनेने 3 फेब्रुवारी 1954 मधील घटनेच्या आठवणी ताज्या केल्या. त्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. लाखोंच्या गर्दीत काही अफवा पसरल्या. त्यानंतर 45 मिनिटे गोंधळ उडला. चेंगराचेंगरी झाली. त्यात 800 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या कुंभमेळ्यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूसुद्धा आले होते.

आता काय घडले?

यंदा महाकुंभात चेंगराचेंगरीची दुर्घटना रात्री एक वाजता घडली. यावेळी संगमावर मौनी अमावस्यानिमित्त स्नान करण्यासाठी गर्दी निर्माण झाली होती. मुख्य संगमावरच स्नान करण्याचा अट्टहास धरला जात होता. गर्दी वाढल्यामुळे संगम रस्त्यावर असलेले बॅरीकेड तुटून गेले. त्यानंतर चेंगराचेंगरी सुरु झाली. मीडिया रिपोर्टनुसार, लोक स्नानासाठी जात असताना बॅरिकेडिंगजवळ लोक झोपलेले होते. त्यामुळे झोपलेल्या लोकांच्या पायात अडकून काही लोक खाली पडले. ते पडताच मागून येणाऱ्या लोकांची गर्दी एकावर एक कोसळत राहिली.

1954 मध्ये काय घडले होते…

1954 च्या कुंभवेळी चेंगराचेंगरी झाली होती. 2 आणि 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री गंगेच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. संगमाच्या काठावरील साधू-मुनींच्या आश्रमात पाणी पोहोचू लागले. या घटनेने लोक भयभीत झाले. यामुळे गोंधळात चेंगराचेंगरी झाली. कुंभचे आंतरराष्ट्रीयीकरणही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. या निमित्ताने नेहरूंचे अनेक लेख भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध झाले. त्या वर्षी सुमारे 50 लाख भाविक महाकुंभात सहभागी झाले होते. त्या दिवशी अशी एक अफवा पसरली की पंतप्रधान नेहरू यांचे हेलिकॉप्टर येत आहे. या अफवेवर विश्वास ठेवून काही लोक त्यांना पाहण्यासाठी धावू लागले. या गोंधळामुळे काही नागा साधू संतप्त झाले आणि त्यांनी चिमट्याने हल्ला केला. यामुळे आणखी अनागोंदी माजली.

1954 च्या कुंभवेळी चेंगराचेंगरी घटनेनंतर पंडित नेहरू यांनी न्यायमूर्ती कमलाकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नेहरू यांनी राजकीय नेते आणि व्हीआयपींना कुंभ स्नानाच्या उत्सवात न जाण्याचे आवाहन केले होते. त्या घटनेनंतर बराच काळ कुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेला आणखी एक अफवा कारणीभूत आहे. गंगा नदीने आपला मार्ग बदलला, अशी अफवा पसरली.

Follow Us
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप