AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी, यमुनेत 50 जणांची नाव उलटून अपघात, 4 मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरु केला. या नावेत ५० जण होते. नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि पलटली.

Video: भावांकडे रक्षाबंधनाला जाणाऱ्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी, यमुनेत 50 जणांची नाव उलटून अपघात, 4 मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
25 बहिणींना जलसमाधीImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 11, 2022 | 5:47 PM
Share

लखनौ- भावांकडे रक्षाबंधनाला (Raksha Bandhan)निघालेल्या 20 ते 25 बहिणींना जलसमाधी (Sisters drown)मिळाल्याची धक्कादायक दुर्घटना उ. प्रदेशात घडली आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी नाव (Boat Sink)यमुनेत उलटल्याने ही दुर्घटना घडली. या नावेत मुलांसह 20 ते 25  महिला प्रवास करीत होत्या, अशी माहिती आहे. हा सगळ्या महिला पक्षाबंधनासाठी माहेरी निघाल्या होत्य, अशीही माहिती समोर येते आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्याला सुरुवात केली आहे. पाणबुड्यांच्या मार्फत बुडालेल्यांचा शोध घेण्यात येतो आहे. आत्तापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून, 25 हून जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

कसा झाला अपघात

रक्षाबंधनाच्या सणासाठी समगरा गावातील महिला, मुले आणि काही पुरुष हे मरका घाटावर पोहचले होते. यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी नावेतून प्रवास सुरु केला. या नावेत 50 जण होते. नाव यमुनेच्या मध्यभागी आल्यानंतर असंतुलित झाली आणि पलटली.

मोटारसायकलीही ठेवल्या नावेत

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या गावाहून पत्नीला घेऊन सासरी राखी बांधण्यासाठी निघालो होतो. नदी किनारी आल्यावर तिथे एकच नाव होती. दुपारी तीन वाजण्याचा सुमार होता. पलिकडे जाण्यासाठी अनेकांची गर्दी तिथे जमा झाली होती. बघता बघता नावेत ४० ते ५० प्रवासी जमा झाले. काही जणांनी त्यांच्या मोटारसायकलीही या नावेतच ठेवल्या होत्या.

बायको आणि मुले गेली वाहून

नाव जेव्हा नदीच्या मध्यभागी आली, तेव्हा नाव हलण्यास सुरुवात झाली. नावेतील लोकं घाबरुन नावेतच इकडून-तिकडे जाऊ लागले. यातच एका बाजूला लोकांची संख्या जास्त झाली आणि नाव एकदम पलटली. काही जण पोहू लागले, काही जण मुलांचा आणि महिलांचा शोध घेत होते. बघता बघता अनेक जण नदीच्या धारेत वाहून जात होते. या अपघातात महिला आणि लहान मुलं मात्र बुडाली. याचवेळी आजूबाजूने जात असलेल्या एक दोन नावांनी बुडालेल्या माणसांना वाचवण्यास सुरुवात केली. अशातच मीही एका नावेवर चढलो पण बायको आणि मुलं वाहून गेलीत.

मोटारसायकलही बुडाली

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नावेवर ४० ते ५० जण होते. त्यातील १५ जणांना वाचवण्यात आले २५ ते ३० जण वाहून गेले आहेत. नदीतून वाचून आलेल्या के पी यादव यांनी सांगितले की, मी लखनौतून समधराला आलो होतो. समधरेला बायकोला सोडून मी बहिणीकडे रक्षाबंधनाला निघालो होतो. मला बरैचीला जायचे होते. माझ्याकडे माटरसायकल होती. नावेत ती ठेवली होती. नाव बुडाल्याने आता मोटारसायकलही गेली आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?