AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Story: नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; ‘या’ गावाची झोप उडाली

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात कोरोना नियमांचे पालन न करताच कोरोनाबाधिताचा मृतदेह दफन करण्यात आला. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Photo Story: नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; 'या' गावाची झोप उडाली
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 09, 2021 | 9:31 AM
Share

जयपूर: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात कोरोना नियमांचे पालन न करताच कोरोनाबाधिताचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यानंतर अवध्या 21 दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, 15 एप्रिल ते 5 मे दरम्यान केवळ चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Rajasthan Village

Rajasthan Village

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी सीकर जिल्ह्यातील खीरवा गावात एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह आणण्यात आला होता. यावेळी 150 लोकांनी त्याच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन न करताच या मृतदेहाचे दफन करण्यात आले. प्लास्टिकच्या थैलीमधून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. अनेक जणांनी या मृतदेहाला हात लावल्याचेही सांगण्यात येते.

Rajasthan Village

Rajasthan Village

सीकरच्या या खीरवा गावात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यातील केवळ तीन ते चार जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. बहुतेकांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही गावातील मृत्यूंची चौकशी केली. गावातील 147 सदस्यांचे स्वॅब घेतले. या सँपलची तपासणी करण्यात येईल. त्यातून या लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला की इतर काही कारणाने झाला याची माहिती मिळेल, असं लक्ष्मण गढचे उप-विभागीय अधिकारी कुलराज मीणा यांनी सांगितलं.

Rajasthan Village

Rajasthan Village

प्रशासनाने गावात स्वच्छता अभियान राबवलं आहे. ग्रामस्थांना या समस्येचं गांभीर्य समजावून सांगितलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत आहे, असं मीणा यांनी सांगितलं. स्थानिक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे. त्यानंतरच या प्रकरणावर भाष्य करता येईल, असं सीकरचे मुख्य आरोग्य अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितलं.

Rajasthan Village

Rajasthan Village

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या मतदारसंघात खीरवा गाव येते. त्यांनीच या मृतदेहाच्या दफनानंतर 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. नंतर त्यांनी ही माहिती सोशल मीडियातून काढून टाकली होती. (21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Rajasthan Village

Rajasthan Village

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये ‘रेमडेसिव्हीर’ काळ्या बाजारात विकताना तिघांना अटक

“खडकवासला जवळ गाडी लावून आत्महत्या करतोय, गाडी विकून येणारे पैसे आईला द्या”

LIVE | प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले? शिवसेनेचा सवाल

(21 deaths in 21 days in this village of Rajasthan)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.