भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला आहे. (35,000 Indian entrepreneurs left country under Modi govt, says Amit Mitra)

भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
amit mitra
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:28 PM

कोलकाता: पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला आहे, असा दावा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी अमित मित्रा यांनी केली आहे.

अमित मित्रा यांनी ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ते 2020 या सहा वर्षाच्या काळात 35 हजार उद्योजक, व्यापाऱ्यांनी देश सोडला आहे. भीतीच्या वातावरणामुळेच उद्योजक आणि व्यापारी देश सोडत आहेत, असं मित्रा यांनी सांगितलं. देश सोडून गेलेले हे सर्व उद्योजक हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे श्रीमंत लोक आहे. आता ते अनिवासी भारतीय बनले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

देश सोडणाऱ्यांमध्ये भारत नंबर वन

मित्रा यांनी सलग ट्विट करून दावा केला आहे. जगात पलायन करणाऱ्यांमध्ये भारत नंबर वन आहे. कारण काय? देशात भीतीचं वातावरण आहे? पंतप्रधानांनी आपल्या सत्ताकाळातील या उद्योजकांच्या पलायनवर एक श्वेतपत्रिकाच काढली पाहिजे, असं एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

देश सोडणाऱ्यांची आकडेवारी

तर, मोर्गन स्टॅनलीच्या एका रिपोर्टनुसार, 2014 ते 2018 दरम्यान 23 हजार हाय नेटवर्थ उद्योजकांनी भारत सोडला आहे. ही जगातील सर्वात वाईट स्थिती आहे. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या अहवालानुसार, 2019मध्ये 7 हजार आणि 2020मध्ये पाच हजार उद्योजकांनी देश सोडला आहे, असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

गोयल यांच्यावर टीका

यावेळी मित्रा यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरही टीका केली आहे. पीयूष गोयल यांचं 19 मिनिटाचं ते भाषण ऐका. त्यात त्यांनी भारतीय उद्योग विश्वाला देश हिताच्या विरोधी असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे ते त्यांना राष्ट्रविरोधी ठरवत आहेत. अशाच प्रकारच्या भीतीच्या वातावरणामुळे उद्योजक देश सोडून जात आहेत. एवढं घडूनही मोदींनी गोयल यांना फटकारले नाही. कारण काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

Jammu Kashmir Poonch encounter : पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही घसरण

(35,000 Indian entrepreneurs left country under Modi govt, says Amit Mitra)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.