AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 5 अशा जागा… जिथे गेल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, एकदा तरी जाऊन याच…

Spiritual Tourism: भारताच्या प्रत्येक भागात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे अशा धार्मिक ठिकाणी अनेकदा भाविकांची गर्दी पहायला मिळते. यातील अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते.या ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.

देशातील 5 अशा जागा... जिथे गेल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, एकदा तरी जाऊन याच...
5 Spritual places
| Updated on: Oct 20, 2025 | 11:07 PM
Share

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या प्रत्येक भागात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे अशा धार्मिक ठिकाणी अनेकदा भाविकांची गर्दी पहायला मिळते. यातील अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते. या ठिकाणी एक वेगळ्याच उर्जेची अनुभूती मिळते. तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनात मानसिक शांतीची गरज असेल किंवा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा अनुभवायची असेल तर तु्म्ही पुढील काही ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे गेल्यावर तुमच्या जीवनात नक्की बदल घडू शकतो. या ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.

वाराणसी

उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर जगातील सर्वात जुने जिवंत शहर मानले जाते. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर जीवन आणि मृत्यूचा संगम दर्शविते. घाटावर बसून गंगेचा प्रवाह पाहणे यामुळे आत्म्याला शांती मिळते. येथे संध्याकाळी हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मंत्रांच्या जपासह गंगा आरती होते. वाराणसी हे केवळ एक शहर नसून आध्यात्मिक उर्जेचे केंद्र आहे. त्यामुळे या शहराला एकदा नक्की भेट द्या.

तिरुपती बालाजी

आंध्र प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध असणारे तिरुपती बालाजी मंदिर भगवान वेंकटेश्वराला समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक बालाजीच्या दर्शनाला येतात. हे मंदिर अतिशय भव्य आहे. तिरुपतीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मन शात होते, थकवा क्षणात नाहीसा होतो, त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या.

बोधगया

बोधगया हे ठिकाण बिहारमध्ये आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. याच कारणामुळे हे बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील महाबोधी मंदिर आणि बोधी वृक्ष भाविकांना एक वेगळ्याच उर्जेची अनुभुती देतात. येथील शांतता मन शांत आणि स्थिर करते. बोधगया केवळ बौद्धांसाठीच नाही तर आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. त्यामुळे या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.

केदारनाथ

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर पर्वतावर बसलेले आहे. हे भगवान शंकराचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी कठीण प्रवास करावा लागतो. मात्र एकदा मंदिरासमोर उभे राहिल्यास सर्व थकवा नाहीसा होतो. येथील भव्य मंदिर आणि बर्फाच्छादित पर्वत मनाला शांती देतात. या ठिकाणी भेट दिल्यानंतर शंकराच्या दैवी उर्जेचा आभास होतो.

अयोध्या

उत्तर प्रदेशातील अयोध्या ठिकाण प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान आहे. शरयू नदीच्या काठावर असलेल्या या शहराला मोठा इतिहास आहे. राम मंदिराच्या बांधकामामुळे या शहराचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे. या शहरातील भक्तीमय वातावरण खूप खास आहे. मंदिरात गेल्यावर भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. अयोध्येत पोहोचल्यानंतर अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे तुम्हीही अयोध्येला भेट देण्याची योजना आखू शकता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...