AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील 5 अशा जागा… जिथे गेल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, एकदा तरी जाऊन याच…

Spiritual Tourism: भारताच्या प्रत्येक भागात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे अशा धार्मिक ठिकाणी अनेकदा भाविकांची गर्दी पहायला मिळते. यातील अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते.या ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.

देशातील 5 अशा जागा... जिथे गेल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, एकदा तरी जाऊन याच...
5 Spritual places
| Updated on: Oct 20, 2025 | 11:07 PM
Share

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या प्रत्येक भागात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे अशा धार्मिक ठिकाणी अनेकदा भाविकांची गर्दी पहायला मिळते. यातील अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते. या ठिकाणी एक वेगळ्याच उर्जेची अनुभूती मिळते. तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनात मानसिक शांतीची गरज असेल किंवा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा अनुभवायची असेल तर तु्म्ही पुढील काही ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे गेल्यावर तुमच्या जीवनात नक्की बदल घडू शकतो. या ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.

वाराणसी

उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर जगातील सर्वात जुने जिवंत शहर मानले जाते. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर जीवन आणि मृत्यूचा संगम दर्शविते. घाटावर बसून गंगेचा प्रवाह पाहणे यामुळे आत्म्याला शांती मिळते. येथे संध्याकाळी हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मंत्रांच्या जपासह गंगा आरती होते. वाराणसी हे केवळ एक शहर नसून आध्यात्मिक उर्जेचे केंद्र आहे. त्यामुळे या शहराला एकदा नक्की भेट द्या.

तिरुपती बालाजी

आंध्र प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध असणारे तिरुपती बालाजी मंदिर भगवान वेंकटेश्वराला समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक बालाजीच्या दर्शनाला येतात. हे मंदिर अतिशय भव्य आहे. तिरुपतीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मन शात होते, थकवा क्षणात नाहीसा होतो, त्यामुळे आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या.

बोधगया

बोधगया हे ठिकाण बिहारमध्ये आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. याच कारणामुळे हे बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील महाबोधी मंदिर आणि बोधी वृक्ष भाविकांना एक वेगळ्याच उर्जेची अनुभुती देतात. येथील शांतता मन शांत आणि स्थिर करते. बोधगया केवळ बौद्धांसाठीच नाही तर आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. त्यामुळे या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या.

केदारनाथ

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर पर्वतावर बसलेले आहे. हे भगवान शंकराचे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी कठीण प्रवास करावा लागतो. मात्र एकदा मंदिरासमोर उभे राहिल्यास सर्व थकवा नाहीसा होतो. येथील भव्य मंदिर आणि बर्फाच्छादित पर्वत मनाला शांती देतात. या ठिकाणी भेट दिल्यानंतर शंकराच्या दैवी उर्जेचा आभास होतो.

अयोध्या

उत्तर प्रदेशातील अयोध्या ठिकाण प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान आहे. शरयू नदीच्या काठावर असलेल्या या शहराला मोठा इतिहास आहे. राम मंदिराच्या बांधकामामुळे या शहराचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे. या शहरातील भक्तीमय वातावरण खूप खास आहे. मंदिरात गेल्यावर भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. अयोध्येत पोहोचल्यानंतर अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे तुम्हीही अयोध्येला भेट देण्याची योजना आखू शकता.

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..