AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षण, आरोग्य व्यवस्था अन् अर्थव्यवस्थेत कोणत्या मुख्यमंत्र्यांचं उल्लेखनीय काम? अभिजीत दीपकेंनी पटकन सगळं सांगून टाकलं

देशातील बेस्ट CM कोण? असं विचारल्यावर अभिजीत दीपके यांनी पटकन नाव सांगितलं. त्यानंतर त्याचं कारणही सांगितले.

शिक्षण, आरोग्य व्यवस्था अन् अर्थव्यवस्थेत कोणत्या मुख्यमंत्र्यांचं उल्लेखनीय काम? अभिजीत दीपकेंनी पटकन सगळं सांगून टाकलं
abhijeet dipke news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 25, 2026 | 11:27 AM
Share

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुद्दयांवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. येत्या 5 सप्टेंबर रोजी कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीत धडकणार आहे. स्कूल ठीक करो अभियानासाठी अभिजीत दीपके आणि त्यांची टीम विविध शाळांना भेटी देताना दिसत आहे. याचदरम्यान, दीपके यांनी देशातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. त्यांनी त्यांच्या मनातील बेस्ट मुख्यमंत्री सांगितला.

एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाला कॉक्रोच जनता पार्टीचे तीन प्रमुख चेहरे पोहोचले होते. यात कार्यक्रमादरम्यान ‘राऊंड फायर’ सुरू झाला. त्यावेळी देशातील सर्व बेस्ट पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर त्यांनी जवाहलाल नेहरू यांचं नाव घेतलं. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनीही सहमती दर्शवली.

बेस्ट मुख्यमंत्री कोण?

अभिजीत दीपके यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिजीत दीपके म्हणाले, माझ्या नजरेत अनेक मुख्यमंत्री चांगले आहेत. एमके स्टॅलिन यांनी अर्थव्यवस्था खूप चांगल्यारितीने सांभाळली. पिनराई विजय यांनी केरळमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवेचे मॉडेल चांगल्या प्रकारे राबवले. दीपके पुढे म्हणाले, ‘दिल्लीत अरविंद केजरवाल यांनीही दिल्लीत शाळा आणि आरोग्य सेवा विभागात चांगली कामे केली आहेत. त्यांनी चांगले काम केलं तर चांगलेच केलं म्हणेन, असं प्रामाणिकपणे सांगेन’ .

सर्वोत्तम शिक्षणमंत्री कोण?

‘मला तसं वाटत नाही. देशातील प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं नाही. त्यामुळे शाळा सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत, असे दीपकेंनी सांगितले. तर आशुतोष रांका म्हणाले, ‘आपल्या देशात शिक्षणमंत्री कोण? हे माहीत नाही. ते पद आता तोट्याचं मानलं जात आहे. अनेक राज्यांत शिक्षण मंत्री आहेत. ते पद अजूनही शिक्षेसारखे मानले जात आहे. तुम्ही लोकांना विचारा, निम्म्या लोकांना राज्याचा शिक्षणमंत्री कोण आहे हे, माहीत नसेल’.

तत्पूर्वी, कॉक्रोच जनता पार्टीने सप्टेंबर महिन्यात दिल्ली शांततापूर्ण मार्गाने मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने मार्चची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिक्षण दिनाच्या दिवशी हा मार्च इंडिया गेटपासून सुरू होईल. त्यानंतर दिल्ली पोलीस मुख्यालयाजवळ सांगता होईल.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला