AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यालयात उशीरा येणाऱ्या सरकारी बाबूंना बसणार फटका, केंद्र सरकारने काढले आदेश

केंद्र सरकारने सध्याच्या नियमांतर्गतही अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागात बायोमेट्रीक हजेरी कर्मचारी लावतात का यावर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

कार्यालयात उशीरा येणाऱ्या सरकारी बाबूंना बसणार फटका, केंद्र सरकारने काढले आदेश
goverment officeImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 17, 2024 | 2:25 PM
Share

केंद्र सरकारने आता कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. ऑफिसात नेहमी उशीरा येणाऱ्या सरकारी बाबूंवर लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयात उशीरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने सक्त ताकीद दिली आहे. कार्यालयात उशीरा येऊन लवकर सटकण्याचा प्रयत्न अनेक सरकारी बाबूंची सवय झाली असून त्यास गंभीरतेने घेतले जाईल. अनेक कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी लावत नसल्याचे उघडकीस आल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मनुष्यबळ मंत्रालयाने मोबाईल फोन आधारित फेस ऑथेंटिकेशन सिस्टीमचे कौतूक करीत या सारख्या अन्य सुविधा आणि लाईव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जियो टॅगिंग सारख्या आधुनिक यंत्रणांचा वापर करणे योग्य असल्याचेही म्हटले आहे. कर्मचारी आधार सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ( एईबीएएस ) चा अहवाल काढून अशा लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा अहवाल डाऊनलोड करावा आणि त्रूटी करणाऱ्यांचा शोध घ्यावा असेही सरकारने म्हटले आहे.

सध्याच्या नियमांनूसार प्रत्येक दिवसाच्या उशीरा येण्याबद्दल अर्ध्या दिवसांची प्रासंगिक ( C L ) रजा लावावी, महिन्यांतून दोन वेळा अशी चूक झाल्यास एक दिवसाची प्रासंगिक रजा कापली जाईल. लेट येण्यास उचित कारण असेल तर सक्षम अधिकारी माफी देऊ शकतात असेही म्हटले आहे. प्रासंगिक सुट्टी लावण्याशिवाय अशा लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई देखील होऊ शकते. कारण उशीरा येणे हे गैरवर्तणूक म्हणून गणले जात असते असे सरकारने म्हटले आहे.

लवकर जाणाऱ्यांनाही सोडू नका !

ऑफिसातून लवकर घरी जाणे हा सुद्धा ऑफीसात लेट येण्यासारखाच एक प्रकाराचा मोठा प्रमाद मानायला हवा. कोणत्याही कर्मचाऱ्यांची वेळ पाळणे, त्याची हजेरी संबंधित डेटाला संबंधित कर्मचाऱ्याला द्यायच्या महत्वपूर्ण असाईन्मेंट, प्रतिनियुक्ती आणि बदली वा पोस्टींगचा विचार करताना ध्यानात घ्यायला हवी. बायोमेट्रीक प्रत्येकी वेळी योग्यप्रकारे कार्यरत असाव्यात असेही सर्व सरकारी विभागांना आदेश काढत केंद्राने सांगितले आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे