AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सद्गुरूंच्या माती वाचवा चळवळीकडून ‘कृषी स्टार्ट-अप महोत्सव 2.0 चे आयोजन, 5000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग

सद्गुरूंच्या माती वाचवा चळवळ आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (17 ऑगस्ट) एसआरएम युनिव्हर्सिटी कॅम्पस, कट्टनकुलथूर, चेन्नई येथे कृषी स्टार्ट-अप महोत्सव 2.0 आयोजित करण्यात आला होता.

सद्गुरूंच्या माती वाचवा चळवळीकडून 'कृषी स्टार्ट-अप महोत्सव 2.0 चे आयोजन, 5000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग
Save Soil Movement
| Updated on: Aug 17, 2025 | 8:51 PM
Share

सद्गुरूंच्या माती वाचवा चळवळ आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (17 ऑगस्ट) एसआरएम युनिव्हर्सिटी कॅम्पस, कट्टनकुलथूर, चेन्नई येथे कृषी स्टार्ट-अप महोत्सव 2.0 आयोजित करण्यात आला होता. या खास महोत्सवात 5000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. यात शेतकरी, गृहिणी आणि शेती आधारित व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तरुणांचा समावेश होता.

कृषी स्टार्ट-अप महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांना उद्योजकता कौशल्याने सक्षम बनवून शेती फायदेशीर आणि शाश्वत कशी बनवायची यावर भर देण्यात आला. अनेक अनुभवी व्यावसायिकांनी सहभागी लोकांना मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम लाईव्ह-स्ट्रीमिंग देखील करण्यात आला. त्यामुळे शेकडो लोक ऑनलाइन पद्धतीनेही यात सहभागी झाले होते.

आजच्या महोत्सवाची सुरुवात माती वाचवा चळवळीचे समन्वयक स्वामी श्रीमुख यांच्या स्वागत भाषणाने झाली. या महोत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात कोल्लमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष नरेंद्र कुमार आणि केंद्रीय कृषी विस्तार कार्यालयाचे संयुक्त संचालक सेल्वम नीरावी यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात बोलताना एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. मुत्तामिझचेलवन म्हणाले की, ‘आम्ही आमचे संस्थापक डॉ. परिवेंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अचिरापक्कम येथे कृषी विज्ञान महाविद्यालय चालवत आहोत. शेती आधारित व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना आम्ही जागा आणि आर्थिक मदत करतो. आम्ही अडीच वर्षांसाठी ही मदत देतो.

कृषी स्टार्ट-अप महोत्सवात नाबार्डचे महाव्यवस्थापक हरी कृष्णन म्हणाले की, ‘मदुराई अ‍ॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन फोरम (MABIF) द्वारे, आम्ही दक्षिण तामिळनाडूमधील ग्रामीण लघु कृषी उद्योजकांना आणि महिलांना त्यांच्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मदत करतो. तसेच मार्केटिंग करण्यासाठीही आवश्यक ते मार्गदर्शन करतो. तसेच NABKISSAN द्वारे स्टार्ट-अप्सना कर्ज देखील दिले जाते. तसेच अ‍ॅग्री श्योर पूर्ण विकसित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी प्रदान करते. आगामी काळात नाबार्ड ईशाच्या सेव्ह सॉइल चळवळीला मदत करेल.’

मदुराई थाना फूड प्रोडक्ट्सच्या संस्थापक धनलक्ष्मी विघ्नेश यावेळी म्हणाल्या की, ‘आम्ही पारंपारिक भाताच्या जातीपासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक विशेष पीठ विकसित केले आहे. तसेच आम्ही आता 100 हून अधिक उत्पादने बनवतो. आम्ही 8 देशांमध्ये याची निर्यात करतो आणि आम्हाला दरमहा 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.’

सी चेंज बिझनेस कन्सल्टिंग आनंदचे संस्थापक एम.के. आनंद म्हणाले, ‘जागतिक स्तरावर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आर्थिक वाढीच्या 50% मध्ये योगदान देतात. भारतात त्यांचा एकूण उत्पादनात 30% वाटा आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, एखाद्याने स्वतःची ताकद, बाजार मूल्य, आर्थिक संसाधने, कच्च्या मालाची उपलब्धता याची माहिती समजून घेणे गरजेचे आहे. देशातील नवीन उद्योजकांसाठी 10 पेक्षा अधिक सरकारी योजना उपलब्ध आहेत.’

या खास कार्यक्रमात कन्नन हरी – पाम एरा फूड्स, अर्चना स्टॅलिन – माय हार्वेस्ट फार्म्स, चेन्नई, वसंतन सेल्वम – फलोत्पादन उद्योजकता विकास केंद्र, पेरियाकुलम, अश्विन कुमार – पॅकेजिंग तज्ञ, मदुराई हे मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक स्टॉल्ससह कृषी उत्पादने आणि लघु-स्तरीय कृषी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.

दरम्यान, सद्गुरूंनी सुरू केलेली माती वाचवा चळवळ ही मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास रोखण्यासाठीचा एक जागतिक उपक्रम आहे. ही चळवळ शेतकऱ्यांना बहुपिकीय आणि नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहित करते. यामुळे मातीची सुपीकता वाढते, पाणी वाचते आणि रसायनांचा वापर थांबतो. यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि नफा देखील वाढतो.

गेल्या 15 वर्षांत या चळवळीच्या माध्यमातून 35000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील 10 हजार शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे शेतकऱ्यांना स्वावलंबी उद्योजक बनण्यासाठी मार्केटिंग आणि व्यवसायाची कौशल्ये शिकवली जातात. याचे मुख्यालय, ईशा योग केंद्र, वेल्लिंगीरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी, ईशान विहार पोस्ट, कोइम्बतूरमध्ये आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…