AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगापूरला जाणाऱ्या 200 प्रवाशांना अचानक दिल्ली विमानतळावर उतरवले, भीतीचे वातावरण, विमानात…

दिल्ली विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवण्याची धक्कादायक घटना पुढे आलीये. या प्रवाशांना अगोदर तब्बल दोन तास विमानात बसून ठेवण्यात आले आणि मग उतरवले. आता त्याचे कारणही पुढे आलंय.

सिंगापूरला जाणाऱ्या 200 प्रवाशांना अचानक दिल्ली विमानतळावर उतरवले, भीतीचे वातावरण, विमानात...
Air India
| Updated on: Sep 11, 2025 | 9:37 AM
Share

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता सातत्याने एअर इंडियाच्या विमानांमधील बिघाडाबाबत बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच चेन्नई विमानतळावर एका एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लॅडिंग करण्यात आली. अहमदाबादच्या विमान अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा जीव या अपघातात गेला. आता नुकताच एक अतिशय धक्कादायक माहिती ही दिल्लीहून सिंगापूरला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाबद्दल येत आहे.

एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवले खाली 

दिल्ली विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवण्यात आले. तब्बल दोन तास हे प्रवासी विमानात बसले होते. मात्र, त्यांना परत विमानातून उतरवण्यात आले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून सिंगापूरला निघाले होते. विमानातील सर्व यात्री विमानात आपआपल्या सीटवर बसले देखील होते. मात्र, विमानातून खाली उतरण्याची विनंती त्यांना करण्यात आली.

तब्बल दोन तास प्रवासी विमानात बसून 

एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. एअर इंडियाचे विमान AI2380 रात्री 11 वाजता दिल्ली विमानतळावरून निघणार होते. परंतु ते उशिराने उड्डाण करण्यात आले. प्रवासी तब्बल दोन तास ताडकळत बसले होते. अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्याने शेवटी प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. याबद्दलची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आलीये. एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने उड्डाणास उशीर 

विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टीम काम करत नव्हती. हेच नाही तर विमानातून लाईट देखील जात येत होती. सुमारे दोन तास विमानात बसल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीकडे नेण्यात आले. अहमदाबादमधील विमानात देखील अपघाताच्या काही वेळ अगोदर प्रवाश्यांनी कुलिंग होत नसल्याचा दावा केला होता. आता परत एकदा दिल्लीहून सिंगापूरच्या निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात देखील बिघाड झाला.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.