AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Flight Crash : अपघातानंतर एअर इंडियाचा सर्वात मोठा निर्णय; प्रवाशांना मोठा दिलासा

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. या अपघातानंतर एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Air India Flight Crash : अपघातानंतर एअर इंडियाचा सर्वात मोठा निर्णय; प्रवाशांना मोठा दिलासा
AIR India Flight
| Updated on: Jun 12, 2025 | 7:35 PM
Share

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि यात सर्व प्रवासी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. आता अपघातानंतर एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अपघातानंतर उड्डाणे थांबवली

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान AI171 अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळल्यानंतर विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरते थांबवण्यात आली आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला. यानंतर एअर इंडियाने या अपघातानंतर मोठा एक निर्णय घेतला आहे.

प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय

एअर इंडियाने कंपनीने १२-१४ जून २०२५ दरम्यान अहमदाबादहून प्रवास करणाऱ्या किंवा अहमदाबादला येण्यासाठी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांसाठी रीशेड्युलिंग फी आणि तिकीट वाढल्याने द्यावे लागणारे जास्त भाड्याची रक्क माफ करण्याची घोषणा केली आहे. १२ जून २०२५ पर्यंत जारी केलेल्या तिकिटांसाठी हे लागू आहे. तसेत जे लोक बुकिंग रद्द करू इच्छित आहेत, त्यांचीही कॅन्सलेशन फी माफ केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या देशाचे किती प्रवासी?

एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

या विमान अपघाताबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितले की, ‘अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे दिसून येत आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत होते. ते लंडनला जाणार होते. मात्र, टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाला एका निवासी भागात अपघात झाला. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते.’

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.